शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पावासाचं थैमान; अनेक भाग जलमय, पुरात अडकलेल्या ८६ लोकांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 17:36 IST

काळ नदीत एक युवक वाहून गेला, मुंबई-गाेवा मगामार्ग ठप्प

रायगड - जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे अलिबाग, राेहा, माणगाव आणि महाड तालुक्यातील विविध भागांमध्ये जलमय झाला आहे. महाड तालुक्याला सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. काळ नदीला पुर आल्याने माणगाव-चिंचवली येथील साेन्याची वाडीमध्ये अडकून पडलेल्या 86 नागरिकांना वाचवले आहे, तर एक युवक काळ नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे.

भारतीय हवामान विभागाने 4 ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबा आणि कुंडलीका नद्यांनी इशारा पातळी आेलांडली हाेती, तर सावित्री नदीने धाेका पातळी ओलांडल्याने तीन राैद्ररुप धारण केल्याने महाड तालुक्यातील काही भागांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांची धाकधुक वाढली आहे. महाड तालुक्यातील नडगावतर्फे बिरवाडीमधील काळभैरव नगर येथे दाेन घरांच्या मागे दरड काेसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. एका घरात काेणीच राहत नव्हते तर दुसऱ्या घरातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आले आहे. महाड-दापाेली विन्हेरे मार्गावर दरड काेसळल्याने तेथील वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

माणगाव तालुक्यातील चिंचवली येथील साेन्याचीवाडीला पुराच्या पाण्याने वेढल्याने सुमारे 100 नागरिक अडकून पडले हाेते. प्रशासन, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने 86 नागरिकांना दुपारपर्यंत रेस्क्यू करण्यात यश आले हाेते. सर्वांना गोरेगावमधील ना. म.जोशी विद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. उर्वरीत नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु आहे. काळनदीमध्ये अशुताेष कुचेकर (वय.19) हा युवक वाहून गेला आहे. त्याचाही शाेध घेण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे कळमजे पुलावरुन काळ नदीचे पाणी वाहत असल्याने मुंबई-गाेवा महामार्ग ठप्प झाला आहे. काेलाड-विळे-निजामपूर-बाेरवाडी-डालघर या मार्गे वाहतुक वळवण्यात आली आहे. मात्र या वळवण्यात आलेल्या मार्गावरुन अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गाेवा महामार्गावर वाहतुक काेंडी झाली आहे. माेर्बा घाटातही दर काेसळल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

अलिबाग तालुक्यातही पावसाने आपले राैद्ररुप दाखवले आहे. बोर्ली-मांडला ते महाळुंगे काकळघर दिशेने जाणाऱ्या मार्गावरील मांडला गावापासून जवळच सोमाई नदीला पुर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. रामराज पुलावरुन देखील पुराचे पाणी जात असल्याने वावे-रामराज हा मार्ग देखील वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा संर्पक तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर