शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:45 IST

गेल्या २४ तासांत १५०० मि.मी. पाऊस । सखल भागांमध्ये शिरले पाणी । पोस्ट ऑफिसची भिंत कोसळली

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल एक हजार ५०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा तडाखा जोरात असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांमध्ये तसेच चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पावसाच्या तडाख्याने अलिबाग पोस्ट आॅफिसची संरक्षक भिंत कोसळली. धुवाधार पावसामुळे रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गुरुवारी ओलांडली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती. पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार बरसण्यास सुरुवात केली. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १८० मि.मी. पाऊस पेण तालुक्यात झाला, तर सर्वात कमी ४५ मि.मी. पावसाची नोंद सुधागड-पाली तालुक्यात झाली आहे.

गुरुवारी पावसाचा जोर कायम होता, तसेच मुंबई-गोवा या राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. प्रवाशांना तासन्तास एसटीची वाट पाहत बसावे लागल्याचे दिसून आहे. कुं डलिका नदीच्यापाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. या संततधार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी करपणाºया भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

नेरळ-माथेरान घाटात जुने झाड कोसळलेनेरळ : गुरुवारी दुपारच्या सुमारास नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे माथेरान घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान, रस्त्यावर प्रवाशांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या सहकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरुवात केली आहे. दोन दिवस सतत पावसाने सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी जमिनीत दलदल होऊन झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच गुरुवारी दुपारच्या सुमारात नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. भले मोठे झाड असल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती आणि त्यामुळे माथेरान घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.

टॅग्स :Rainपाऊस