शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गरोदर महिला, मुलांच्या आरोग्याची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 23:48 IST

नेरळ : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिला आणि मुलांच्या आरोग्य समस्यांकडे आरोग्य विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे कुपोषण वाढण्याची व ...

नेरळ : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिला आणि मुलांच्या आरोग्य समस्यांकडे आरोग्य विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे कुपोषण वाढण्याची व माता, नवजात शिशू मृत्यू होण्याची स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप कॅन प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या आढावा सभेत केला. पंचायत समिती सभापती सुजाता मनवे यांच्या उपस्थितीत १७ आॅगस्ट रोजी पंचायत समिती सभागृहात कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्युट्रिशन प्रकल्प कर्जतच्या वतीने तालुक्यातील कुपोषण व आरोग्य सेवा या विषयावर आढावा सभा आयोजित केली होती.तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी कळंब, खाडस, नेरळ व अंबिवली ही आरोग्य केंद्रे आदिवासी उपाययोजनेतील असून, या आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यापासून कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी केली नाही. गरोदर महिलांचीही आरोग्य तपासणी केली गेली नाही. परिणामी, भागातील गरोदर महिलांना बाळंतपणासाठी कर्जतच्या खासगी रुग्णालयात जावे लागले. खासगी रुग्णालयात एका सामान्य बाळंतपणासाठी बारा ते आठरा हजार रुपये खर्च आदिवासी व गरीब महिलांना करावा लागल्याचे पुरावे कॅन प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी सादर केले .मातामृत्यू रोखण्यासाठी सरकार एका बाजूला जननी-शिशू सुरक्षा, प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांसारख्या घोषणा करते आहे. संस्थात्मक बाळंतपण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कर्जतच्या आरोग्य सेवा देणाºया संस्था सरकारच्या धोरणालाच हरताळ फासत आहेत, ही गंभीर बाब आढावा सभेत समोर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.कोविडच्या प्रभावामुळे अंगणवाडीत मुलांना न बसवता, मुलांचा आहार घरपोच देण्याची सूचना सरकारने केली आहे. हा आहार पूर्ण आणि वेळच्या वेळी पोहोचतो की नाही, याबाबतचे नियंत्रण नसल्याची बाबही कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली. पर्यवेक्षकांच्या अंगणवाडी भेटी कमी असल्यामुळे गरोदर महिलाचे समुपदेशन होत नाही, तसेच कु पोषित मुलांच्या घरी होम व्हिजिटही होत नाहीत. परिणामी, तालुक्यात नियंत्रणात असलेली कुपोषित मुलांची संख्या वाढण्याची संभावना नाकारता येणार नाही, अशी माहिती कॅन प्रकल्पाच्या कार्यकर्त्या विमल देशमुख यांनी सभेमध्ये दिली. यावेळी सभेला पंचायत समिती उपसभापती भीमा पवार, पंचायत समिती सदस्या जयवंती हिंदोळा आदी उपस्थित होते.>४० पैकी ११ गावांमध्येच तपासणीकॅन प्रकल्प राबवत असलेल्या चाळीस गावांपैकी फक्त अकरा गावांतच मुलांची आरोग्य तपासणी झाली असून, इतर भागांत तपासणी करण्यात आली नाही. १४ मे रोजी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुलांचे व महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देऊनही तपासणी केली गेली नाही. संबंधित आरोग्य अधिकाºयावर कारवाई व्हावी, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य जयवंती हिदोळा यांनी मांडली.एकात्मिक बालविकास प्रकल्प एकने या वर्षी पंचायत समिती शेषफंडातून कु पोषित मुलांना अंडे वाटपाची तरतूद केल्यामुळे व कर्जत तालुक्यात कायमस्वरूपी बाल उपचार, पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्यामुळे प्रकल्प अधिकारी पालकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.तालुक्यातील आदिवासी भागातील तीव्र कुपोषित व मध्यम श्रेणीतील कुपोषित मुलांसाठी ठाणे जिल्हापरिषदेच्या धर्तीवर ‘होम व्हिसीडीसी’ सुरू करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. कर्जत शहरात एक खासगी रुग्णालय आहे, ज्यांनी मान्यता घेतलेली नाही, अशा रुग्णालयांमध्ये या बहुतांश प्रसूती झाल्या, उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ सेवा देतात, ही गंभीर बाब असल्याचे दिशा कें द्राचे जंगले यांनी सांगितले.>कोविडचे कारण देत कोणी आरोग्य अधिकारी गरोदर महिला व मुलांना आरोग्य सेवा नाकारत असतील, तर अशा आरोग्य अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.- सुधाकर घारे, उपाध्यक्षतथा आरोग्य सभापती रायगड जिल्हापरिषद