शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 12:59 AM

रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत विरले : उद्भव कुठे असावा, यासाठी रखडले काम

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये नेहमीप्रमाणे पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्या दोन्ही वाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी नळपाणी योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिले होते. त्यानंतर या ठिकाणी गतवर्षी जिल्हा परिषदेने नळपाणी योजना मंजूर केली होती. मात्र, ही नळपाणी योजना आजही कागदावरच आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या नळपाणी योजनेची घोषणा रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने केली होती. दरम्यान, नळपाणी योजनेचा उद्भव कुठे असावा, यासाठी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांची नळपाणी योजना रखडली असून येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन जावे लागत आहे.

पाथरज ग्रामपंचायतमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्यातील मोठी आदिवासीवाडी समजली जाते. तर त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून असलेली आदिवासीवाडी आहे. त्या दोन्ही आदिवासीवाड्यांमधील महिलांना जानेवारी महिन्यापासूनरात्र विहिरीवर काढावी लागते. गतवर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघु-पाटबंधारे विभागाने २७ लाख रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी केली होती. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांनी आम्हाला दुरुस्ती नको तर नवीन पाणी योजना पाहिजे आणि त्या योजनेचा उद्भव हा बांगरवाडी मातीच्या बंधाºयाचा असावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७ लाखांचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी २०१८ मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन नळपाणी योजना ही बनगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधाºयातील उद्भव निश्चित करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार झालेले अंदाजपत्रक हे एप्रिल २०१८ मंजूर झाले नाही. त्या वेळी नव्याने केलेले अंदाजपत्रक हे ६७ लाखांचे बनले होते. मात्र, बांगरवाडी येथील मातीचा बंधारा हा जुना असून तेथील पाण्याचा काही भरवसा नसल्याने आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा झाली. मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना करताना ती डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करण्याची सूचना आमदार सुरेश लाड यांनी केली. त्यामुळे आता ९३ लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार झाले असून ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचे निश्चित झाले आहे.पाण्यासाठी भटकं तीताडवाडी आणि मोरेवाडी या दोन्ही वाडीतील लोकांसाठी तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या वेळी शेजारी असलेल्या मोरेवाडी येथील महिलांची बांगरवाडी मातीच्या धरणावर पाण्यासाठी जाण्याची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी मंजूर झालेली नळपाणी योजना आता प्रत्यक्षात आली असती तर दोन्ही आदिवासीवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढण्याची वेळ आली नसती. त्यात पाथरज ग्रामपंचायत गेल्या तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकत असल्याने सध्या तरी ताडवाडी आणि मोरेवाडीला पाणी मिळत आहे.बांगरवाडी येथील मातीचा बंधारा शासनाचा नाही, त्यात त्या बंधाºयांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पहिल्यापासून मागणी असलेल्या डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती, आता त्यांना गती मिळाली असून, योजना महिनाभरात सुरू होईल.- रेखा दिसले, सदस्य, रायगड जिल्हा परिषदताडवाडी आणि मोरेवाडी येथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, स्थानिक लोकांनी उद्भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.- डी. आर. कांबळे,उपअभियंता, लघु-पाटबंधारे विभाग

टॅग्स :Raigadरायगड