शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मृदा संधारणासाठी प्लॅस्टिक गादीचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:22 IST

जलतज्ज्ञांनी विकसित केले तंत्र : सुधागडात सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर काम

- विनोद भोईर

पाली : वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी वाहून जाते. त्यामुळे मृदेचा ºहास होतो. हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, मृदा संधारण व बंधारा लवकर, कमी पैशांत व सोप्या रीतीने बांधण्यासाठी मातीच्या ऐवजी प्लॅस्टिक कापडाचा (गादी) वापर करण्याचे तंत्र जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी विकसित केले आहे.

नुकतेच सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचा बंधारा बांधण्यात आला होता. जिल्ह्णातील हा बहुधा पहिला प्रयोग आहे. सिद्धेश्वर गावचे सरपंच उमेश यादव यांना जलतज्ज्ञ डॉ. गोखले यांनी गावात अशा स्वरूपाचा पहिला प्रयोग करण्यास सांगितले. त्यानुसार गोखले यांनी तयार केलेल्या प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या किंवा गादीसारखे कापड देण्यात आले. काही दिवसांपूर्वी सिद्धेश्वर गावात ज. नौ. पालीवाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे शिबिर भरले होते. या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मिळून प्लॅस्टिक कापडाच्या पिशवीद्वारे (गादी) बंधारा बांधून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य केले. मात्र, काही दिवसांनी कापडाला छिद्र पडले; पण बंधारा सुस्थितीत होता. काही लोकांनी बंधाऱ्याचे हे प्लॅस्टिक लंपास केले. तरीसुद्ध हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात काही सुधारणा करून पुन्हा या पद्धतीने इतरत्र मृदा संवर्धनाचे बंधारे बांधले जाऊ शकतात, असे जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी सांगितले.

काम कसे करावे?च्ज्या ओढ्यामध्ये बंधारा बांधायचा असेल, तेथे तळाचा भाग साधारण सपाट करतात. ओढ्यातील गाळ वा रेवसा हलवून जलाभेद्य स्तरापर्यंत जावे. उघडा कातळ असेल तर त्याची गरज पडत नाही. साधारण समतल करून घेणे. थोडी असमतोल जागा असेल तरीसुद्धा बंधाºयाच्या वरील भाग सम ठेवणे. त्यानंतर ही प्लॅस्टिकची गादी तेथे बसवून घेणे. गादी पूर्णपणे पाण्याने भरून घेणे, यामुळे गादीचे वजन वाढते आणि एक छोटा बंधारा पटकन तयार होतो. गरज पडल्यास थोडे दगड किंवा गोणी वापरून बांधाला आधार द्यावा.

उपयोग व महत्त्वमाती वाचते, मृदा संधारण होते. कमी वेळात बंधारा पूर्ण होतो. बांधाºयातील पाणी आटले तरी बांधामध्ये पाणी असेल तेही बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वापरता येईल.

कोकणातील ओढ्यांमध्ये किंवा आजूबाजूला तशीही माती कमी असते. बंधारा बांधण्यासाठी ती माती गोणींमध्ये भरली जाते. मात्र, दरवर्षी ही माती वाहून जाते व मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वनराई बंधारे बांधताना मातीच्या ऐवजी काय वापरता येईल आणि बंधारा सोपा कसा होईल त्याचा विचार करत होतो, त्या वेळी असे लक्षात आले की, आपण जाड प्लॅस्टिकची एक मोठी गादी तयार केली आणि पाण्याने भरली तर तीसुद्धा हे काम करू शकेल. म्हणून प्रयोगादाखल एक प्लॅस्टिकची एक हवाबंद गादी तयार करून घेतली. त्या गादीत पाणी भरण्यासाठी पाइप ठेवले. ती वापरून सिद्धेश्वर येथे तो बंधारा प्रायोगिक तत्त्वावर घालण्यात आला. यात कष्ट कमी आहेत आणि माती वाहून जाण्याचा धोका नाही.- डॉ. अजित गोखले, जलतज्ज्ञ, डोंबिवली