शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मृदा संधारणासाठी प्लॅस्टिक गादीचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:22 IST

जलतज्ज्ञांनी विकसित केले तंत्र : सुधागडात सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर काम

- विनोद भोईर

पाली : वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी वाहून जाते. त्यामुळे मृदेचा ºहास होतो. हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, मृदा संधारण व बंधारा लवकर, कमी पैशांत व सोप्या रीतीने बांधण्यासाठी मातीच्या ऐवजी प्लॅस्टिक कापडाचा (गादी) वापर करण्याचे तंत्र जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी विकसित केले आहे.

नुकतेच सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचा बंधारा बांधण्यात आला होता. जिल्ह्णातील हा बहुधा पहिला प्रयोग आहे. सिद्धेश्वर गावचे सरपंच उमेश यादव यांना जलतज्ज्ञ डॉ. गोखले यांनी गावात अशा स्वरूपाचा पहिला प्रयोग करण्यास सांगितले. त्यानुसार गोखले यांनी तयार केलेल्या प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या किंवा गादीसारखे कापड देण्यात आले. काही दिवसांपूर्वी सिद्धेश्वर गावात ज. नौ. पालीवाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे शिबिर भरले होते. या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मिळून प्लॅस्टिक कापडाच्या पिशवीद्वारे (गादी) बंधारा बांधून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य केले. मात्र, काही दिवसांनी कापडाला छिद्र पडले; पण बंधारा सुस्थितीत होता. काही लोकांनी बंधाऱ्याचे हे प्लॅस्टिक लंपास केले. तरीसुद्ध हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात काही सुधारणा करून पुन्हा या पद्धतीने इतरत्र मृदा संवर्धनाचे बंधारे बांधले जाऊ शकतात, असे जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी सांगितले.

काम कसे करावे?च्ज्या ओढ्यामध्ये बंधारा बांधायचा असेल, तेथे तळाचा भाग साधारण सपाट करतात. ओढ्यातील गाळ वा रेवसा हलवून जलाभेद्य स्तरापर्यंत जावे. उघडा कातळ असेल तर त्याची गरज पडत नाही. साधारण समतल करून घेणे. थोडी असमतोल जागा असेल तरीसुद्धा बंधाºयाच्या वरील भाग सम ठेवणे. त्यानंतर ही प्लॅस्टिकची गादी तेथे बसवून घेणे. गादी पूर्णपणे पाण्याने भरून घेणे, यामुळे गादीचे वजन वाढते आणि एक छोटा बंधारा पटकन तयार होतो. गरज पडल्यास थोडे दगड किंवा गोणी वापरून बांधाला आधार द्यावा.

उपयोग व महत्त्वमाती वाचते, मृदा संधारण होते. कमी वेळात बंधारा पूर्ण होतो. बांधाºयातील पाणी आटले तरी बांधामध्ये पाणी असेल तेही बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वापरता येईल.

कोकणातील ओढ्यांमध्ये किंवा आजूबाजूला तशीही माती कमी असते. बंधारा बांधण्यासाठी ती माती गोणींमध्ये भरली जाते. मात्र, दरवर्षी ही माती वाहून जाते व मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वनराई बंधारे बांधताना मातीच्या ऐवजी काय वापरता येईल आणि बंधारा सोपा कसा होईल त्याचा विचार करत होतो, त्या वेळी असे लक्षात आले की, आपण जाड प्लॅस्टिकची एक मोठी गादी तयार केली आणि पाण्याने भरली तर तीसुद्धा हे काम करू शकेल. म्हणून प्रयोगादाखल एक प्लॅस्टिकची एक हवाबंद गादी तयार करून घेतली. त्या गादीत पाणी भरण्यासाठी पाइप ठेवले. ती वापरून सिद्धेश्वर येथे तो बंधारा प्रायोगिक तत्त्वावर घालण्यात आला. यात कष्ट कमी आहेत आणि माती वाहून जाण्याचा धोका नाही.- डॉ. अजित गोखले, जलतज्ज्ञ, डोंबिवली