शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘पाली भूतीवली’चे पाणी बिल्डरांसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:33 IST

कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे.

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. शासनाचा हा उद्देश पाली भूतीवली धरणात यशस्वी झालेला दिसत नाही. कारण धरणाच्या जलाशयात २००४ पासून पावसाचे पाणी साठून राहत असून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालवे बांधले नसल्याने शेती केली जात नाही. दरम्यान,पडून असलेले पाणी तेथील बिल्डर अनेक वर्षे वापरत आहेत, मात्र त्यावर शासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.पाली भूतीवली धरण तेथील तीन गावे स्थलांतरित करून बांधण्यात आले असून परिसरातील १५ गावामधील ११०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी हे धरण बांधले गेले. १९९२ मध्ये धरणाचे काम सुरू झाले आणि धरणाची मुख्य भिंत २००४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र त्यावेळपासून आजतागायत धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे १५ किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.परिणामी शेतीसाठी पाणी सोडता येत नाही अशी भूमिका पाटबंधारे खाते घेत असते. परंतु या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, पण शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.>धरण उशाला आणि कोरड घशाला; ग्रामस्थांची अवस्थाधरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून त्याद्वारे पाणी उचलले जात असून त्यावर पाटबंधारे खात्याचे पर्यायाने शासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कारण तेथील एका बिल्डरला पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने केलेला करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला आहे असे असताना देखील धरणाच्या जलाशयातून पाण्याचा उपसा सुरू आहे.त्यावेळी धरणाच्या समोर असलेल्या आणि धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीमधील सर्व वाड्यांना साधे पिण्याचे पाणी नाही. मात्र त्यावेळी बिल्डर लॉबी वापरत असलेल्या पाण्यावर त्या त्या ठिकाणी स्वीमिंग पूल पाण्याने भरलेले आहेत असे विदारक चित्र पाली भूतीवली धरण परिसरात आहे.धरण उशाला आणि कोरडा घशाला अशी स्थिती पाली भूतीवली हद्दीमधील ग्रामस्थांची झाली असून त्यात अधिक रहिवासी हे आदिवासी आहेत, त्यांना मात्र या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचवेळी धरणाचे कालवे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी देऊन देखील करण्यात येत नसल्याने स्थानिक लोकांनी पाटबंधारे खात्याला जबाबदार धरले आहे. पाटबंधारे विभाग बिल्डरसाठी आपले पाणी राखून ठेवत असून त्यांना पाणी देण्यासाठी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधले जात नसल्याचा आरोप देखील स्थानिक शेतकरी करीत आहेत.>आपण या धरणाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रयत्न केले आहेत, त्यामुळे धरणाची उभारणी ज्यासाठी झाली आहे,तो उद्देश सफल करण्यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील. कालवे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मानसिकता शेतीला पाणी मिळावे अशी दिसत नसल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतात कधी पाणी येणार याकडे चातकासारखी वाट पाहत आहे.- देवेंद्र साटम, माजी आमदार>धरणातील पाणी देण्याबाबतचे सर्व अधिकार कोलाड विभागीय कार्यालयाला असून तेथून कोणालाही पाणी देण्याचे कोणतेही निर्देश आले नाहीत. त्यामुळे सध्या त्या खासगी संस्थेला धरणातून पाणीपुरवठा सुरू असल्याबद्दल तत्काळ चौकशी केली जाईल. त्याचवेळी कालव्यांची कामे करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे केली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कालव्यांच्या कामांना सुरुवात होईल.- पी.सी. रोकडे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग>पाली -भूतीवली या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, परंतु अनेक वर्षे उलटूनही परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या भागातील आदिवासी बांधवांना देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, परंतु त्यांना देखील या धरणाचे पाणी मिळत नाही. शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले. बिल्डर धरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून पाणी उचलत आहे. पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने लवकरात लवकर या भागातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी द्यावे, अशी परिसरातील आम्हा सर्व शेतकºयांची मागणी आहे.- हेमंत घारे, शेतकरी-उमरोली