शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

By admin | Updated: April 23, 2017 02:19 IST

स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात

- जयंत धुळप, अलिबाग स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात या लोखंडनिर्मिती उद्योगाच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ आणि पेण तालुक्यांतील पाच गावांतील ३४ महिला स्वयंसहाय्यता गटांनी राबवला आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्याजवळील खारपाणी घुसून नापीक झालेल्या शेतात पुन्हा भातशेतीची लागवड करता येणार आहे. कांदळवन लागवडीचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. धरमतर खाडीकिनारचा फुटलेला ५ हजार ९०१ मीटर लांबीचा बंधाराही जेएसडब्ल्यू इस्पातच्या १ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बांधण्यात आला. त्यामुळे नापिक झालेली १५ गावांतील ५ हजार हेक्टर भातशेती खाऱ्या पाण्यापासून संरक्षित झाली. बंधाऱ्याचे काम सुरू असतानाच, तज्ज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ आणि किनारी गावांतील जाणकार ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदळवनांच्या कोणत्या जातीची रोपे तयार करायची, हे निश्चित करण्यात आले. तसेच रोपे तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यूच्या वनस्पती व फलोत्पाद संशोधन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात आल्या. या रोपवाटिकांमध्ये स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे ३४० महिलांनी रोपांची निर्मिती केली.गतवर्षी ८ आॅक्टोबर रोजी ग्रामसमृद्धी संकल्प चमू, जेएसडब्ल्यूचे अधिकारी, जेएसडब्ल्यू इस्पात सामाजिक उत्तरदायित्व निधी विनियोग समितीचे प्रमुख मोहन घाडगे आणि ३४ महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत कांदळवन रोप लागवडीस प्रारंभ करण्यात आला. २५ ते २८ आॅक्टोबर २०१६दरम्यान लागवड करण्यात आलेल्या या सर्व रोपांचे वनस्पती तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले. वर्षभरात रोपांनी चांगलाच जोम धरला असून, धरमतर खाडीकिनारच्या नैसर्गिक जैवविविधतेस नव्याने समृद्धी प्राप्त झाल्याचे शनिवारच्या जागतिक वसुंधरा दिनी स्पष्ट झाले आहे.भात लागवड शक्यलागवड करण्यात आलेल्या १ लाख ५ हजार ४३५ कांदळवनांच्या रोपांमुळे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या माऱ्याची तीव्रता कमी होईल. शिवाय खाडीकिनारी गावांत यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा भात लागवडीखाली येऊ शकेल, असा आशावाद धरमतर खाडीकिनारच्या या १५ गावांतील शेतकरी ग्रामस्थांना आहे. आगामी काळात विठ्ठलवाडी ते भाल या किनारी भागातील ५० एकर क्षेत्रांत कांदळवन लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली आहे.