शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:20 IST

Nisarga Cyclone: एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर सात तालुक्यांतील सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील एक लाख 73 नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. तब्बल 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

आविष्कार देसाई

अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर सात तालुक्यांतील सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील एक लाख 73 नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती झाली आहे. निसर्ग असे या वादळाला नावं देण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या सात तालुक्यांतील किनार्‍यालगतच्या गावांना बसणार आहे. येथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माेठ्या संख्येने नागरिक स्वतःच सुरक्षित स्थळी जाण्यास तयार झाले असल्याने प्रशासनावरील ताण कमी हाेणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले हाेते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने श्रीवर्धन-हरिहरेश्वरला बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला हाेता, मात्र त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने आपला माेर्चा हा अलिबागकडे वळवल्याने अलिबागकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या रायगड जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत. अलिबागला दाेन आणि हरिहरेश्वरला एक तुकडी तैनात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. त्याचप्रमाणे उरण येथे नागरी संरक्षण दल आणि मुरुड येथे काेस्टगार्ड आपत्तीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. आपत्ती कालावधीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलामध्ये सुमारे 25 स्वयंसेवी संस्था तत्पर राहणार आहेत.

-----------

रायगड किनारपट्टीवरील 60 गावांमध्ये सुमारे 1 लाख 73 हजार नागरिक राहत आहेत. येथे कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या 60 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू केली आहे.

हेही वाचा

ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

CoronaVirus : राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये आरोपित ‘PFI’वर मुंबई पालिकेची मर्जी कशासाठी?, फडणवीसांचा 'बाण'

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य

CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ