शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:20 IST

Nisarga Cyclone: एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर सात तालुक्यांतील सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील एक लाख 73 नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. तब्बल 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

आविष्कार देसाई

अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर सात तालुक्यांतील सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील एक लाख 73 नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती झाली आहे. निसर्ग असे या वादळाला नावं देण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या सात तालुक्यांतील किनार्‍यालगतच्या गावांना बसणार आहे. येथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माेठ्या संख्येने नागरिक स्वतःच सुरक्षित स्थळी जाण्यास तयार झाले असल्याने प्रशासनावरील ताण कमी हाेणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले हाेते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने श्रीवर्धन-हरिहरेश्वरला बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला हाेता, मात्र त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने आपला माेर्चा हा अलिबागकडे वळवल्याने अलिबागकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या रायगड जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत. अलिबागला दाेन आणि हरिहरेश्वरला एक तुकडी तैनात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. त्याचप्रमाणे उरण येथे नागरी संरक्षण दल आणि मुरुड येथे काेस्टगार्ड आपत्तीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. आपत्ती कालावधीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलामध्ये सुमारे 25 स्वयंसेवी संस्था तत्पर राहणार आहेत.

-----------

रायगड किनारपट्टीवरील 60 गावांमध्ये सुमारे 1 लाख 73 हजार नागरिक राहत आहेत. येथे कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या 60 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू केली आहे.

हेही वाचा

ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

CoronaVirus : राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये आरोपित ‘PFI’वर मुंबई पालिकेची मर्जी कशासाठी?, फडणवीसांचा 'बाण'

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य

CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ