शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:40 IST

बिल्डरांची मनमानी : प्रशासनाचे दुर्लक्ष; पावसाला सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ धामोते या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. हा परिसर प्राधिकरणात असल्यामुळे अनेक नामांकित गृह प्रकल्प येथे आकार घेत आहेत. मात्र, गृहप्रकल्प उभे करत असताना बिल्डर आपली मनमानी करत आहेत असे चित्र आहे. त्यामुळे येथील पूर्वापारपासूनचे नाले यांचे मार्ग पूर्णत: बंद होत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणातील कोणी अधिकारी जागेवर येत नाही की ग्रामपंचायत त्यांना थांबवत नाही. त्यामुळे नेरळ-कळंब हा राज्यमार्ग दरवर्षी सातत्याने पाण्याखाली जात आहे. यंदा तर एका इमारत व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भराव केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नेरळ-कळंब या रस्त्याची काय अवस्था होणार या विचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यातील मोठे शहर म्हणून नेरळ आकार घेत आहे. तेव्हा शासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून साधारण २००२ साली येथे नेरळ विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तेव्हा इमारत व्यावसायिकाला बांधकाम करताना प्राधिकरणाची मंजुरी घेऊन काम करावे लागते. त्यासाठी विकास करदेखील प्राधिकरणाला द्यावा लागतो. या प्राधिकरणात नेरळसह, ममदापूर, बोपेले, धामोते या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळ व्यतिरिक्त इतर भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी धामोते गावाच्या हद्दीत नेरळ-कळंब या राज्यमार्गालगत सध्या एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने आणि पावसाळ्याचे पाणी याच मार्गाने नदीत जात असल्याने विकासकाने मातीचा मोठा भराव करून काम सुरू केले आहे. मुख्य रस्त्यापासून जमीन साधारण तीन फूट खाली आहे. तिथपासून मातीचा भराव करून बांधकाम वर उचलण्यात आलेले आहे. यामुळे पाण्याचा मुख्य मार्ग बंद होणार आहे. गेली काही वर्षे नेरळ-कळंब हा रस्ता सातत्याने पाण्याखाली जात आहे. येथे होणारी बांधकामे ही नियोजनशून्य पद्धतीने होत आहेत. परिणामी मुख्य नाल्याचा मार्ग वळविणे, तो खंडित करणे, अशा गोष्टी सर्रास घडत आहेत. मुळात जिल्हाधिकारी बांधकामासाठी परवानगी देतानाच त्यात मुख्य पाण्याच्या मार्गांना बाधित न करता बांधकाम करावे, अशा अटीवर बांधकाम परवानगी देत असतात. मात्र बिल्डर लॉबी आपली मनमानी करून बिल्डिंग बांधून निघून जातात. त्यानंतर तेथे राहणाऱ्या सदनिकाधारकांना भविष्यात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असते.२०१७ पासून नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली येत आहेत. तत्कालीन प्रांताधिकारी दत्ता भडकवाल यांनी धामोते येथे प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम व्यावसायिकांना पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजून बिल्डर लॉबीची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.येथील काम हे नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. कुणीही बिल्डर येतो आणि कुठेही बांधकाम करतो. यात स्थानिक प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतीला काहीही घेणेदेणे नाही. जो तो सदस्य फक्त आपल्याला काय लाभ होईल याचाच विचार करतो. परिणामी याचे दुष्परिणाम गावाला आणि ग्रामस्थांना भोगायला लागतात.- दत्तात्रेय विरले, ग्रामस्थ, धामोतेसंबंधित बांधकाम व्यावसायिकाला आम्ही प्राधिकरणाची किंवा आणखी कोणती इमारत बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे ग्रामपंचायतीत सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी ती अद्याप सादर केलेली नाहीत तसेच ग्रामपंचायतीचा बांधकाम ना हरकत दाखलादेखील घेतलेला नाही.- रामदास हजारे, उपसरपंच, कोल्हारे ग्रामपंचायत