शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, हार्दिक पटेलची जहाल टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:30 PM

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान

रायगड - मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला दोन कोटी रोजगार द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. आज शेतकऱ्याचा मुलगा कष्टाने परीक्षेत अधिक मार्क मिळवतो. पण, त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. आज देशातील शिक्षणव्यवस्था आणि रोजगार यांची अवस्था अशी बनलीय, जणू देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी सरकारवर जहाल टीका केली. 

आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान बनविण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. आरक्षण लागू केलं, त्यावेळी त्यांनीही ज्या समाजाची संख्या अधिक त्या समाजाला तेवढा वाटा मिळेल असं म्हटल्याचे हार्दिक यांनी सांगितले. जिसकी जितनी संख्यादारी, उसकी उतनी भागिदारी, जोपर्यंत हे गणित लागू होत नाही. तोपर्यंत कुणालाही बरोबरीचा वाटा या देशात मिळणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं असावं हे जगाला दाखवून दिलयं. पण, आताचे शासन कसं वागतयं हे आपल्याला माहितच आहे. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, या समाजाला आरक्षण का पाहिजे, याचा अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले. तसेच, जे लोक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही करत नाहीत, ते लोक महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत, असे म्हणत हार्दिक यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGovernmentसरकारreservationआरक्षणmaratha mahasanghमराठा महासंघ