शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील आगीची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:27 IST

एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा अपुरी : कंपन्यांचे फायर आॅडिट तत्काळ होणे गरजेचे

सिकंदर अनवारे ।दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रीव्ही कंपनीला गुरुवारी लागलेल्या आगीची धग शुक्रवारी सायंकाळपर्यंतही कायम होती. आगीने औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक क्षेत्राशी संबंधित शासकीय विभाग, सरकारच्या उद्योगवाढीच्या धोरणामुळे कठोर कारवाई करत नसल्याने सातत्याने अशा घटना समोर येत आहेत.महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही आॅर्गनिक इंडिया लि. कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणताना स्थानिक प्रशासन आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र, ही यंत्रणा अपुरी पडल्याने अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलास या वेळी पाचारण करण्यात आले. आगीचे रौद्ररूप लक्षात घेऊन लगतच्या गावांतील ग्रामस्थांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या परिसरात पोलिसांकडून तत्काळ प्रवेशबंदी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. शिवाय मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढल्याने अफवांचे पेव फुटले.आगीवर नियंत्रणासाठी कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित एक आराखडा तयार करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न केल्याने कंपनीबाहेर ठेवलेल्या रसायनांनीही पेट घेतला. आग विझवताना फोम मारणे अपेक्षित असताना पाणी मारले जात होते. अखेर इतर ठिकाणाहून आलेल्या अग्निशमन यंत्रणांनी फोमचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रीव्ही कंपनीच्या शेजारी देव्हाड्रिल, ओंकार केमिकल, लासा असे छोटे-मोठे प्लांट आहेत. या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा वापरूनही आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले असते.प्रीव्ही कंपनीतील आगीमुळे एमआयडीसी क्षेत्रातील कुचकामी सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, या क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था सक्षम आहे की नाहीत, याबाबत पाहणी करत नाहीत किंवा नसल्यास कठोर कारवाई करीत नाहीत. महाडमध्ये अनेक कारखान्यांत अशा घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, कारवाईचा केवळ दिखावा करून सोडण्यात येत असल्याने कंपन्या पुन्हा जैसे थे सुरू राहतात.महाडमधील प्रदीप शेट्टे या कारखान्यात आतापर्यंत दोन मोठे अपघात झाले आहेत. यात मनुष्यहानीही झाली आहे. मात्र, हा कारखाना आजही सुरू आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात अनेक भंगार गोदामे आहेत. दोन वर्षांपूर्वी एका भंगार गोदामात वायुगळती होऊन चार जण ठार झाले होते. तर गतवर्षी एका भंगार गोदामाला टेमघर गावात आग लागली होती. मात्र, आजही ही गोदामे सुरूच आहेत. या क्षेत्राशी संबंधित शासकीय विभाग कठोर कारवाई करीत नसल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. अनेक कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. इमारतींचे आॅडिट होते की नाही, हा प्रश्न आहे. मात्र, कामगार-अधिकारीदेखील याबाबत कोणतीच ठोस भूमिका या ठिकाणी घेताना दिसत नाहीत. यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेले कारखाने तशाच स्थितीत सुरू आहेत. प्रीव्ही कंपनीच्या बाहेर उभी असलेली अनेक वाहने खाक झाली आहे. यात चार ट्रक आणि शेकडो दुचाकी वाहने आहेत. या वाहनांची नुकसानभरपाई इन्शुरन्स कंपनीकडून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. ज्या दुचाकींचा इन्शुरन्स नसेल अशा दुचाकीना नुकसानभरपाई मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना या वाहनाचा पूर्ण मोबदला मिळाला नाही तर त्यांचे वैयक्तिकरीत्या मोठे नुकसानच होणार आहे.प्रीव्ही कंपनीतील आगीची माहिती सर्वत्र पसरतच गेली, यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. आग आटोक्यात येत नाही, हे लक्षात येताच पंकज गिरी यांनी निरीक्षण करून कंपनीच्या दुसऱ्या बाजूने धाव घेतली. या ठिकाणी समोरील बाजूला आलेले मातीच्या गाड्या आणि पाण्याच्या गाड्या मागील बाजूस घेऊन गेले. गटारे बुझवणे आणि पाण्याचा मारा करणे सुरू केला. काही क्षणातच आगीवर नियंत्रण आले आणि अग्निशमन दलाच्या गाड्या कारखान्यात आत गेल्या.यामुळे कंपनीचा हायड्रोजन प्लांट वाचवणे प्रशासनाला शक्य झाले. गिरी यांनी या वेळी दाखविलेली समयसूचकता आग आटोक्यात आणण्यास मोलाची ठरली. हायड्रोजन प्लांट वाचल्याने अनेकांचे जीवन वाचवल्याची भावना उपस्थित व्यक्त करीत होते.प्रीव्ही कंपनीबाहेरील रसायन उचलणारप्रीव्ही कंपनी ही सुगंधी द्रव्य बनवणारी कंपनी आहे. जवळपास तीन युनिट येथे काम करत आहेत. दोन नंबरमधील कंपनीत लागलेल्या आगीत शेकडो लिटर रासायनिक द्रव्य बाहेर पडले.या द्रव्याने आग तर पसरलीच, शिवाय आगीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. काळ्या धुराने शेजारील गावे व्यापली होती. तर आजदेखील कंपनी समोरील गटारे या घातक रासायनिक द्रव्याने भरली आहेत. हे द्रव्य पुन्हा उचलून कंपनीच्या ई.टी.पी. प्लांटमध्ये प्रक्रिया करून पुन्हा हे सांडपाणी महाड सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणले जाईल. या सर्वांचा अहवाल महाड प्रदूषण मंडळाला द्यावयाचा आहे, अशी माहिती प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी दिनेश वसावा यांनी दिली.

टॅग्स :fireआग