शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

महाराजांच्या नावावर राज्य चालते; मात्र मराठे वंचित!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 12:28 AM

मराठा समाजाचे आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यासंदर्भात समाजातील विविध घटकांतून संमिश्र प्रतिक्रिया

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारचा कायदा आणि गायकवाड समितीच्या शिफारशी नाकारण्यात आल्या आहेत. या निकालामुळे सरकारला माेठा धक्का बसला आहे. 

शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त राज्य चालविले जात आहे. मात्र, महाराजांचे मराठे आरक्षणापासून वंचित राहिले आहेत. सरकार सर्वाेच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात कमी पडले आहे. निकालानंतर मराठा समाजातून चांगल्याच तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत, तर तामिळनाडूच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्यावा, असाही सुर  उमटत आहे. 

राजकीय साठमारीमध्ये मराठा समाजाचे नुकसान हाेत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले आहे. यामध्ये सरकारने याेग्य बाजू मांडली नाही. अन्य राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण चालते. मात्र, महाराष्ट्रात मराठ्यांना दिलेले आरक्षण फेटाळले जाते. सर्वाेच्च न्यायालयामध्ये सरकार बाजू मांडण्यामध्ये अपयशी ठरले आहे. ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध ठरविले असले तरी ते आजच्यापुरते आहे. भविष्यात ते मिळणार आहे का?- रघुजी आंग्रे, सकल मराठा समाज, राज्य समन्वयक

सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी असा आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या संघर्षाला धक्का बसला आहे. गायकवाड आयाेगाने मराठा समाजाला मागास ठरविले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण कसे देता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.- विनाेद साबळे,  सकल मराठा समाज, रायगड जिल्हा समन्वयक 

मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सरकारने सर्वाेच्च न्यायालयात याेग्य बाजू मांडली नाही. अन्य राज्यांत क्षमतेपेक्षा अधिक आरक्षण दिले जाते; परंतु महाराष्ट्रात चालत नाही. शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेऊन राज्य चालविले जात आहे. प्रत्यक्षात मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे.- अरविंद पाशीलकर, मराठा महासंघ, अध्यक्ष

सकल मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासून भूमिका हाेती. तामिळनाडूमध्ये ७३ टक्के आरक्षण दिले गेले. भारत सरकारने दुरुस्ती केली हाेती. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका स्वीकारावी, अशी मागणी संसदेत केली हाेती. त्यानुसार आता केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यावा.- सुनील तटकरे, खासदार, रायगड

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले आहेत. आता केंद्र सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय देण्याची आग्रही भूमिका घेणे गरजेचे आहे.- भरत गाेगावले, आमदार, महाड

सर्वाेच्च न्यायालयाचा आजचा निकाल मराठा समाजासाठी अतिशय दु:खद आहे. न्यायालयाच्या निर्णयाविराेधात बाेलून अवमान करणे याेग्य हाेणार नाही. समाजात वाढणारा आक्राेश, असंताेष थांबविण्यासाठी सरकारने तातडीने याेग्य पावले टाकणे गरजेचे आहे. याबाबत संघटनेची लवकरच दिशा ठरविण्यात येईल.                     - नरेश चव्हाण, सकल मराठा समाज, अलिबाग तालुकाध्यक्ष

मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस आहे. अनपेक्षित निकाल आहे. आम्हाला वाटले की, निकाल स्थगित ठेवतील. मात्र, थेट आरक्षण आणि कायदाच रद्द करून टाकला आहे. सरकार बाजू मांडण्यात नक्कीच कमी पडले आहे. आता सरकारची जबाबदारी आहे की मराठा समाजाला न्याय कसा द्यायचा.- उल्हास पवार, सचिव, अलिबाग

टॅग्स :RaigadरायगडMaratha Reservationमराठा आरक्षण