शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महाडजवळील महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी हलवणार,चांढवे गावहद्दीत नवीन चौकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:48 IST

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर असणाºया वाहतूक शाखा पोलीस चौक्या अपघातानंतर मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात, वाहतुकीला होणारे अडथळेदेखील नेहमी दूर करत असतात. महाड शहरानजीक असलेली वाहतूक शाखा पोलीस चौकी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानंतर या ठिकाणाहून हलवून तालुक्यातील चांढवे या गावहद्दीत नवीन होणाºया टोल नाक्याजवळ बांधण्यात येणार असल्याची माहिती याच विभागाकडून प्राप्त झाली आहे. जर चांढवे या ठिकाणी ती बांधण्यात आली तर जवळपास ४० किलोमीटर अंतरावर या चौकीचा मदतीसाठी काही उपयोग होणार नाही.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे. महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकीदेखील या ठिकाणाहून उचलून चांढवे गावहद्दीत बांधण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या पोलीस चौकीअंतर्गत इंदापूर ते पोलादपूर असे ५७ किलोमीटरचे अंतर आहे. आजही इंदापूर आणि माणगाव विभागात वाहतूककोंडी किंवा अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महाडवरून वाहतूक शाखा पोलिसांना फार वेळ लागतो. इंदापूरपासून या चौकीचे अंतर जवळपास ४० किलोमीटर इतके आहे. आशा परिस्थितीत जर ही चौकी चांढवे या गावहद्दीत बांधण्यात आली तर या अंतरामध्ये पुन्हा १० किलोमीटरची वाढ होणार आहे. अशावेळी इंदापूर किंवा माणगाव विभागासाठी या चौकीचा काही उपयोग होणार नाही. अपघात प्रसंगी या चौकीपासून कोणतीही मदत लवकर मिळणे अशक्य होणार आहे.या चौकीअंतर्गत महामार्गाचे इंदापूर ते पोलादपूर ५७ किलोमीटर अंतर आहे. पुढील चौकी मध्यवर्ती ठिकाणी आल्यास दोन्हीकडील हद्दीत लक्ष ठेवता येईल.- वाय.एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा, महाडअपघात प्रसंगी उपयोग नाही१महाड शहरानजीक असलेली महामार्ग वाहतूक शाखा पोलीस चौकी जरी नवीन महामार्ग झाला तरी एकतर त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी; नाहीतर इंदापूर आणि पोलादपूर या ५७ किलोमीटर अंतराच्या मध्यभागी बांधण्यात यावी. जेणेकडून अपघात, वाहतूककोंडी किंवा इतर काही अडथळा असो पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तातडीची मदत वाहनचालकांना मिळू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.२२०१९ मध्ये इंदापूर ते पोलादपूरदरम्यान जवळपास १०० हून अधिक अपघात झाले. यामध्ये ९० अपघात हे महाड आणि इंदापूरदरम्यान झाल्याची नोंद आहे. आशा परस्थितीत महाड येथील महामार्ग वाहतूक पोलीस चौकी ही त्याच ठिकाणी ठेवण्यात यावी, नाहीतर मध्यभागी म्हणजेच दासगाव किंवा वीर गाव हद्दीमध्ये बांधावी; अथवा ५७ किलोमीटर अंतरामध्ये दुसरी चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडtraffic policeवाहतूक पोलीस