शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

गायमुखला पर्यटनाचा दर्जा देणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:56 AM

पालकमंत्र्यांचे आश्वासन : तळा येथे जनता दरबार

तळा : पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृह जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढे नागरिकांनी बेरोजगारी, पाणी प्रश्न, रस्त्याची झालेली दुरवस्था अशा विविध समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यातील गायमुखला पर्यटनाचा दर्जा दिला जाईल तसेच ऐतिहासिक कुडालेणी, तळगड यांचादेखील विकास केला जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

सुरुवातीलाच नागरिकांनी महावितरण विभागाच्या मनमानी कारभाराची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. सूचना न देता वीजपुरवठा बंद करणे, मीटरची रीडिंग न घेता वीजबिल देणे, बिल्डरांना दहा दिवसांत मीटर दिला जातो तर गोरगरीब जनतेला महिना उलटूनही मीटर दिले जात नाहीत, तक्रारीसाठी कार्यालयात गेले असता अधिकारी उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारींचा पाढाच वाचला. तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न, बसस्थानकाची झालेली दुरवस्था, पर्यटनवाढीची उपाययोजना, खेडेगावातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या शेतकरी बांधवांनी मांडल्या. त्याला उत्तर देताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्यात कंपन्या येऊन रोजगार उपलब्ध केला जाणार आहे, बसस्थानकाची दुरुस्ती करून योग्य सुविधा पुरविल्या जातील, पाण्याची टंचाई असलेल्या गावात पाण्याचे नवीन पाइप टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामे सुरू केली जातील. अपूर्ण असलेल्या रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण करण्यात येतील.या जनता दरबारात तहसीलदार ए.एम. कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव, पंचायत समिती सभापती देवकी लासे, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांसह सर्व शासकीय अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड