शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

बारणे गावातील शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 1:02 AM

तालुक्यातील बारणे गावातील एका तरु ण शेतक-याने शेतीमधील नुकसानीबद्दल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालकीची जमीन नसलेल्या त्या शेतक-याने दुस-याची शेती भाड्याने घेऊन शेती केली होती.

कर्जत : तालुक्यातील बारणे गावातील एका तरु ण शेतक-याने शेतीमधील नुकसानीबद्दल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मालकीची जमीन नसलेल्या त्या शेतक-याने दुस-याची शेती भाड्याने घेऊन शेती केली होती. मात्र, अवेळी पावसाने त्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर त्या शेतकºयाच्या डोक्यावर होता.बारणे गावातील शेतकरी चंद्रकांत गणू ठोंबरे हे दिवसा मोलमजुरी आणि रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. ३८ वर्षीय ठोंबरे यांच्या कुटुंबाकडे जमीन नसल्याने त्यांनी शेतीतून खायचे तांदूळ पिकविण्याचा निर्णय घेतला आणि गावातील एका शेतकºयाची दोन एकर जमीन भाड्याने घेऊन भाताची शेती करण्याचा निर्णय घेतला. जून २०१७ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने भाताची शेती केली. शेती करण्यासाठी जमीन भाड्याने घेताना बियाणे, खते हे कर्ज काढून आणले होते. त्या वेळी जमिनीतून भाताचे उत्पादन झाल्यानंतर लोकांकडून घेतलेले कर्ज फेडू, असा विश्वास चंद्रकांत ठोंबरे यांना होता. रात्री कर्जत तालुक्यातील कुशिवली येथे असलेल्या कॉलेजमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे चंद्रकांत हे दिवसा शेतात काम करायचे. दिवाळी सणाच्या दरम्यान सर्वत्र अवेळी पाऊस झाला होता. वादळी वाºयासह सतत आठवडाभर आलेल्या पावसामुळे चंद्रकांत ठोंबरे यांनी लावलेल्या शेतात उभे असलेले भाताचे पीक कोसळले होते. त्या भागातील जमीन पाण्याची असल्याने शेतात साचून राहिलेले पाणी अनेक दिवस तसेच राहिले आणि भाड्याने जमीन घेऊन केलेल्या भाताच्या शेतातील पीक हे शेतातच कुजून गेल्याने ठोंबरे कुटुंबाचे नुकसान होऊन चंद्रकांत ठोंबरे हे कर्जाच्या फेºयात अडकले. याच तणावात १ डिसेंबर रोजी सकाळी घरातून काहीही न सांगता घराबाहेर पडलेला चंद्रकांत दुपार झाली तरी घरी आला नाही, म्हणून वडील,पत्नी, मुलगा आणि भाऊ हे शोध सुरू के ला असता शेतात विषारी औषध प्राशन के ल्याचेलक्षात आले.ग्रामस्थांच्या मदतीने या शेतकºयाला कर्जत येथे दवाखान्यात नेले. मात्र, दुपारी अडीच वाजता या शेतकºयाचा मृत्यू झाल्याचे डॉ. साबणे यांनी जाहीर केले. अशा प्रकारे शेतीत झालेले नुकसान यामुळे बारणे गावातील तरु ण शेतकºयाला आत्महत्या करण्याची वेळ आली.

टॅग्स :Farmerशेतकरी