शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

स्वॅब टेस्टच ठरणार एन्ट्री पास; पालकमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:51 AM

रायगड जिल्ह्यात १२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांसाठी नियम लागू

रायगड : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात यायचे असेल, तर स्वॅब टेस्ट करणे अनिवार्य आहे. १२ आॅगस्टनंतर येणाऱ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे, तसेच क्वारंटाइनचा कालावधी हा १० दिवसांवर आणण्यात आला असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हा शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक हे मुंबई-पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी ते रायगड जिल्ह्यातील मूळ गावी परत येतात. सर्वत्र कोरानाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मुंबई-पुणे या ठिकाणीही कोरोनाचा प्रभाव आहे. याच परिस्थितीमध्ये सण, उत्सव साजरे करावे लागत आहेत, परंतु बाहेरून जिल्ह्यात येणाºयांपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकार आणि प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यात चाकरमान्यांना यायचे असेल, तर त्यांनी १२ आॅगस्टपूर्वी येणे बंधनकारक आहे. त्यानंतर, येणाºयांकडे कोरोना स्वॅब टेस्ट केल्याचा रिपोर्ट असल्याशिवाय त्यांना ई-पास मिळणार नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्यांना ई-पास मिळणारच नाही. क्वारंटाइनची मर्यादा आधी १४ दिवसांची होती. मात्र, रायगड जिल्ह्यासाठी आता १० दिवसांची करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.गणेशोत्सव साजरा करताना सरकार आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. गणेश आगमनाच्या वेळी आणि गणेश विसर्जनाच्या वेळी कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही, तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. गणेशभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू नये, असेही आवाहन तटकरे यांनी केले.जिल्ह्यातच कोरोनाची चाचणीकोरोनाच्या चाचणीसाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात मंजूर झालेली प्रयोग शाळा २० आॅगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यातच कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.कोकणात येण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि वीर स्थानकावर या रेल्वे गाड्यांचा थांबा असणार आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरून प्रवास टळणार आहे.समाजोपयोगी कार्यक्रम करावेतगणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे यांच्यावर मंडळांनी मोठ्या प्रमाणात खर्च करू नये. त्या बदल्यात आरोग्य शिबिरांसारखे समाजोपयोगी कार्यक्रम करावेत, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबत कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.महामार्गावरील खड्डे भरण्याबाबत ठकेदारांना सूचना : जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पावसामध्ये पुन्हा खड्डे पडले आहेत. संबंधित ठकेदारांना खड्डे भरण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या