शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भरावामुळे खाडीकिनारे धोक्यात; जेटी बांधकामामुळे नदीपात्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:15 IST

खाडीपात्र अरुंद होऊन भविष्यात केरळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिकंदर अनवारे दागसाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीपट्टा विभागात गेली अनेक वषे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून रेती उत्खनन सुरू आहे, त्यामुळे खाडीपात्राला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यालगतची वनसंपदा नष्ट होत आहे. याशिवाय सावित्री खाडीच्या किनाºयांवर अनधिकृत जेटी आणि भराव केला जात आहे. यामुळे खाडीपात्र अरुंद होऊन भविष्यात केरळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आल्यानंतर बहुतांश शेतकºयांनी शेती सोडून दिली. पारंपरिक पद्धतीने हातपाटीद्वारे वाळू उत्खननातून पैसे मिळू लागल्याने अनेकांच्या नजरा सावित्री खाडीकडे वळल्या. कालांतराने यंत्राद्वारे वाळू उत्खनन होऊ लागले. या यंत्राने पर्यावरणाचा धोका असताना वाळू उत्खनन सुरूच आहे. स्थानिकांनी आपल्या जागा रेतीउपशाकरिता आणि साठ्याकरिता दिल्या आहेत. वाळूतून मिळणाºया पैशांच्या हव्यासापोटी पर्यावरणाचा सर्रास ºहास केला जात आहे. काही ठिकाणी खारफुटीची कत्तल करून, प्लॉट तयार करण्यात आले आहेत. याबाबत अनेक तक्र ारी होऊन संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय, याच प्लॉटवर रेतीसाठा आणि उपशाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.महाड तालुक्यातील सव, रावढळ, तुडील, जुई, म्हाप्रळ, कुंबळे, वराठी, या गावांबरोबरच दासगाव, टोळ, सापे, दाभोळ, कोकरे ही गावे खाडीलगत आहेत. दासगाव, वराठी, सापे, टोळ, कोकरे, दाभोळ, ओवळे या गावांच्या परिसरात रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून, यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. उत्खनन होणारी वाळूसाठ्याकरिता आणि होड्या लावण्याकरिता प्लॉटधारकांनी थेट नदीतच बांधकामे केली आहेत. नदीपात्रात भराव करून पक्के बांधकाम करून जेटीची कामे केली जात आहेत.जिल्हा प्रशासनाने देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये मौजे कोकरे तर्फे गोवेले, मोजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या भागातील प्लॉट हे सी.आर.झेड. प्रमाणे संरक्षित आहेत. यातील काही गावांतील प्लॉट हे कांदळवनामध्ये येतात. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने कांदळवन क्षेत्रातील बांधकामांवर पूर्णत: बंदी घालणे आदी नियमावली देण्यात आली आहे, असे असतानाही मौजे कोकरे तर्फे गोवेले, मौजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या गावांतून या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच कांदळवन क्षेत्रात रेतीसाठ्यास परवानगीमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ज्या ठिकाणी रेतीसाठ्यास परवानगी देण्यात आली आहे, ते प्लॉट कांदळवन क्षेत्रात येतात, तशा प्रकारचा उल्लेख नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने जमीन वापर दाखल्यावर केला आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने याच प्लॉटवर रेतीसाठ्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्लॉटवर वाळूच्या माध्यमातून निघणारा रेजग्याचा भराव करण्यात आला आहे. सावित्री खाडीत हा भराव करून जेटीचे पक्के बांधकाम देखील करण्यात आले आहे. सावित्रीच्या दोन्ही बाजूने हा प्रकार सुरू असल्याने खाडीचे अतोनात नुकसान होत आहे. यापूर्वी रासायनिक पाण्याने खाडीचे नुकसान झाले आणि आता वाळूउपशाकरिता कृत्रिम उपाय पर्यावरणास आणि खाडीकरिता धोकादायक बनले आहेत.केरळसारखी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोकाकेरळमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण देश हादरून गेला. या निसर्गाच्या प्रकोपाला मानवच जबाबदार असून, नदी-खाडीकिनारी होणारे बेसुमार उत्खनन कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. अशीच परिस्थिती महाडमध्ये उद्भवण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात येत आहे.खाडीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची आणि कांदळवन नुकसानाची पाहणी केली जाईल, त्यानुसार कारवाईही केली जाईल.-विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :riverनदी