शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

धामणी दीड महिन्यापासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:21 PM

धरणाची सुरक्षा धोक्यात : जलसंपदा विभागाने बिल थकवल्याने महावितरणची कारवाई

-  शशिकांत ठाकूर 

कासा : जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातील धामणी धरणवीज बिल थकल्याने दीड महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे कासा भागात सतत भूकंप होत असताना धरणाची सुरक्षा वाºयावर आहे.

जलसंपदा विभागाने थकीत फरक वीज बिल न भरल्याने ३ जानेवारी पासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील विद्युत मीटरील मिटरिंग युनिट मध्ये बिघाड होता. ते लोड देऊन त्याचे दोन किट फोलटी असलेले बदलले. या काळात जलसंपदा विभागाने त्यांना सरासरी अंदाजे मासिक वीज बिल दिले जात होते व ते भरलेही होते. मात्र, सप्टेंबरमध्ये मिटरिंग युनिट व्यवस्था सुरळीत झाल्याने सदर काळात अधिक वापर केलेल्या युनिटचे दोन वर्षाच्या फरक बिलासह जलसंपदा विभागास आॅक्टोबर २०१८ या महिन्यात ९ लाख ७६ हजार वीजबिल पाठविले त्यांपैकी २ लाख ४८ हजार वीजबिल भरले.

परंतु सर्वच फरक न भरल्याने पुढील नोव्हेंबरमध्ये ७ लाख ७२ हजार, डिसेंबर ८ लाख २३ हजार आणि जानेवारी महिन्यात ८ लाख ५६ हजार पाठवले. या मध्ये तीन महिन्याचे २ लाख ५६ हजार व ६ लाख फरक होते. त्यातच थकीत बिल न भरल्याने ३ जानेवारीला वीजपुरवठा खंडित केला. परंतू याबाबत जलसंपदा विभागाकडे विचारणा केली असता आम्हाला प्रत्येक मिहन्याला साधारण १ हजार युनिटसह पावसाळा वगळता ३५ ते ४० हजार दिले जात होते मात्र मिटरिंग युनिट फोलटी मुळे दोन वर्षांचे फरक बिल एकदाच आॅक्टोबर ६५ हजार ८९३ युनिटसह ९ लाख ७६ हजार दिले. त्यास वरिष्ठ पातळीवर मंजुरी लगेच कशी मिळेल. त्याचा मंजुरी साठी प्रस्ताव पाठवला आहे.

यातील धक्कादायक बाब म्हणजे धरण परिसरतील कासा जवळपास गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत असताना जलसंपदा विभागातील अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे धामणी धरण गेल्या दीड महिन्या पासून अंधारात आहे. धरणाच्या ठिकाणी पोलिस व जलसंपदा विभागाचे कर्मचारी असले तरी वीज नसल्याने अंधारात हलचालींवर लक्ष ठेवणे कठीण बनले आहे.

धोकादायक परिस्थितीया धरणातून उन्हाळ्यात डहाणू, पालघर व विक्र मगड तालुक्यातील सुमारे १०० गावांना कालव्याअंतर्गत शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वसई विरार महापालिका, तारापूर टैप्स, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पावर डहाणू, पालघर नगरपालिका, डहाणू नगरपालिका आदी ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.च्यातून जलसंपदा विभागाला दरवर्षी साधारणपणे १८ कोटीं रुपयांचा सिंचन महसूल मिळतो. तसेच, शेती सिंचनातून वर्षापोटी पाच लाख रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असून देखील थकित बील अभावी धरणावर दीड महिन्यापासून अंधार आहे व सरकारचे दुर्लक्ष आहे.

धामणी धरणावरी वीज बिल थकीत आहे. ते थकीत व चालू वीज बिल भरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरू केला जाईल.- किरण नागावकरअधीक्षक अभियंता वीज वितरण पालघरधरणाची सुरिक्षतता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून वीज बिलासाठी निधी उपलब्ध झाला असून सोमवारी महावितरणकडे अदा केला जाईल व धरणावरील वीज सुरू होईल.- निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सुर्या प्रकल्प

टॅग्स :Damधरणelectricityवीज