शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:56 PM

शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची बागायतदारांची मागणी

अलिबाग : जिल्ह्यात चालू वर्षात उच्च तापमान, बदलते हवामान आणि अवेळी पडणारा पाऊ स अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने, आंबा उत्पादक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे शासकीय स्तरावर सर्वेक्षण होऊन नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होत आहे.

आंब्याच्या उत्पादनाकरिता फवारणी, औषधे, मनुष्यबळ आदी सर्व खर्च मोठा होत असून, त्या प्रमाणात यंदा आंबा उत्पादन मिळालेले नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना ३५ ते ४० टक्के आंबा हाती लागला आहे. अशीच अवस्था राहिल्यास आंबा बागाईतदार भुईसपाट होईल. तो होऊ नये यासाठी शासनाने आंबा उत्पादकांना सहकार्य करावे, अशीही अपेक्षाही भुवनेश्वर येथील आंबा बागायतदार तथा कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थांचे संचालक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. बदललेल्या हवामानामुळे तसेच वारंवार पडलेल्या थंडीमुळे या वर्षी आंब्याचा मोहर गर्भावस्थेत असताना कमी झाला. परिणामी, आंब्याची धारणा कमी झाल्याने उत्पादकता खाली आली. आंबा उत्पादन कमी असल्याने पर्यायाने त्यावर आधारित शेतमजूर, खोके बनवणारे, वाहतूक व्यवसायदार, यांच्यावर विपरित परिणाम झाल्याचे पाटील यांनी सांगितले.आंबा नुकसानाचा अहवाल शासनास पाठवणारच्हवामानातील सततच्या बदलामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनात यंदा सुमारे ६० टक्के घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंबा उत्पादक शेतकºयांचे अल्प उत्पन्न वा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये त्याचबरोबर नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी, याकरिता कृषी विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकºयांनी हा पीक विमा घेतला आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळेल. दरम्यान, आंबानुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे.