शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:41 AM

सुनील तटकरे यांनी केली मुरुड तालुका नाखवा संघाबरोबर चर्चा

आगरदांडा : मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी मत्स्य विकासमंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली आहे. नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी तिथे यावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टीबाबतचा निर्णय होईल. मच्छीमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या जेट्टीबाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्यमंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल, असे अभिवाचन खासदार तटकरे यांनी मुरुड तालुका नाखवा संघाला दिले.अगरदांडा बंदरात मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी जेट्टी मिळावी, या आपल्या प्रमुख मागणीसाठी राजपुरी दिघी, एकदरा व मुरुड परिसरातील सर्व नाखवा मंडळी एकत्र येत, मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मासळीची मोठे मार्केट बंद असल्याने मच्छीमारांना आपली मासळी विकता येत नव्हती, त्यामुळे आम्हाला आगारदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेट्टी बांधून मिळावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मोठे सागरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सोमवारी आगरदांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जेट्टीची पाहणी केली.यावेळी मच्छीमारांनी आपली समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी आगरदांडा जेट्टी ही मच्छीमारांसाठी योग्य व सुरक्षित असून, आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छीमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी. कारण समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने, पकडलेली मासळी वाया जात असल्याचे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे, नारायण गोलान, धुरवा लोदी, चेअरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी, तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कोळी समाजाने फेडरेशन तयार करावेरायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, तातडीने जेट्टी जरी मंजूर केली, तरी याला दीड वर्ष तरी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छीमारांना कायमस्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे, मासळीला वाढती मागणी असून, शीतगृहसुद्धा विकसित करता आले पाहिजे,कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे, मासेमारीबरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधनेसुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेसुद्धा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे खा.सुनील तटकरे म्हणाले.