शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:39 IST

तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले

मुरुड : तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. त्यानंतर पाणीटंचाई संपुष्टात आली याचबरोबर गतवर्षी शिघ्रे, उंदरगाव आणि आंबोली गाव येथील कालव्याची कामे पूर्ण झाल्याने यंदा या परिसरातील शेतीदेखील ऐन उन्हाळ्यात हिरवीगार झाली आहे.सध्या आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरुड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मेअखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. मुरुड तालुका हा नवाबकालीन तालुका असून या वेळी मुरुड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नवाब राजांनी बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त सात हजार होती;परंतु आता हीच लोकसंख्या १६ हजारांच्या वर पोहचली असून येथे सलग सुट्ट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आंबोली धरणामुळे आता संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर ५०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

मुरुडमध्ये वर्षाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असून पावसाळ्यात किमान ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक शनिवार, रविवार या दिवशी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे. आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते,त्या वेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात पर्यटक पोहण्याचा आनंद लुटत असतात.

आज स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे,आदी महत्त्वाची पिके घेऊन येथील शेतकरी सधन होताना दिसत आहे. तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या छोट्या खानावळ व हॉटेल हा व्यवयास सुद्धा तेजीत आला आहे. एका धरणामुळे स्थानिक शेतकरी यांच्याबरोबर पर्यटनाला चालना मिळून लोकांना आर्थिक सुबत्ता येत आहे. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मिळाला दिलासापर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान १० किलोमीटर परिसरात असणाºया गावांना सुद्धा पाणीपुरवठा होऊन काही निवडक कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील काही शेतकरी दुबार शेती सुद्धा करीत आहेत. एकंदर या धरणामुळे पर्यटक व स्थानिक शेतकरी यांना मोठा दिलासा मिळून सुमारे ५० हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जिथपर्यंत कालवे आहेत तिथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते. तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना पाणी उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे अशी मागणी येथील काही शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींना पोहचवण्यात येऊन येथील जलसिंचन मर्यादा वाढवण्यात आल्यास येथील शेतकरी सुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीDamधरण