शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:39 IST

तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले

मुरुड : तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. त्यानंतर पाणीटंचाई संपुष्टात आली याचबरोबर गतवर्षी शिघ्रे, उंदरगाव आणि आंबोली गाव येथील कालव्याची कामे पूर्ण झाल्याने यंदा या परिसरातील शेतीदेखील ऐन उन्हाळ्यात हिरवीगार झाली आहे.सध्या आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरुड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मेअखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. मुरुड तालुका हा नवाबकालीन तालुका असून या वेळी मुरुड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नवाब राजांनी बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त सात हजार होती;परंतु आता हीच लोकसंख्या १६ हजारांच्या वर पोहचली असून येथे सलग सुट्ट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आंबोली धरणामुळे आता संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर ५०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

मुरुडमध्ये वर्षाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असून पावसाळ्यात किमान ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक शनिवार, रविवार या दिवशी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे. आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते,त्या वेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात पर्यटक पोहण्याचा आनंद लुटत असतात.

आज स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे,आदी महत्त्वाची पिके घेऊन येथील शेतकरी सधन होताना दिसत आहे. तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या छोट्या खानावळ व हॉटेल हा व्यवयास सुद्धा तेजीत आला आहे. एका धरणामुळे स्थानिक शेतकरी यांच्याबरोबर पर्यटनाला चालना मिळून लोकांना आर्थिक सुबत्ता येत आहे. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मिळाला दिलासापर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान १० किलोमीटर परिसरात असणाºया गावांना सुद्धा पाणीपुरवठा होऊन काही निवडक कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील काही शेतकरी दुबार शेती सुद्धा करीत आहेत. एकंदर या धरणामुळे पर्यटक व स्थानिक शेतकरी यांना मोठा दिलासा मिळून सुमारे ५० हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जिथपर्यंत कालवे आहेत तिथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते. तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना पाणी उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे अशी मागणी येथील काही शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींना पोहचवण्यात येऊन येथील जलसिंचन मर्यादा वाढवण्यात आल्यास येथील शेतकरी सुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीDamधरण