शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रसायनांमुळेच लागली आग

By admin | Updated: April 23, 2017 03:54 IST

महाड औद्योगिक वसाहतीतील टेमघर गावातील हद्दीत गुरुवारी भंगार अड्ड्यावर अग्निकांड झाले. भंगार म्हणजे लोखंड, पत्रा, प्लास्टीक आदि टाकाऊ वस्तू असे पकडले

- सिकंदर अनवारे,  दासगाव

महाड औद्योगिक वसाहतीतील टेमघर गावातील हद्दीत गुरुवारी भंगार अड्ड्यावर अग्निकांड झाले. भंगार म्हणजे लोखंड, पत्रा, प्लास्टीक आदि टाकाऊ वस्तू असे पकडले तर ही आग खूप क्षुल्लक ठरते. मात्र सुमारे पाच तासांपेक्षा जास्त वेळ सातत्याने पाणी मारल्यानंतर देखील आटोक्यात न येणाऱ्या या भंगार गोदामाच्या आगीमध्ये नक्की काय जळतेय? हा प्रश्न निर्माण होत आहे. अग्निकांड होत असताना छोटे-मोठे आठ स्फोट आणि सॉलवंडसारख्या ज्वालाग्रही रसायनांचा साठा भंगार अड्ड्यावर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. महाड औद्योगिक वसाहतीत टाकाऊ पदार्थ म्हणून अनेक कारखान्यातून भंगारात मोठ्या प्रमाणात ज्वालाग्रही सॉलवंड टाकले जाते. प्लास्टीक आणि लोखंडी ड्रममधून कारखानदार हे वेस्ट सॉलवंड भंगारवाल्यांना देत असतात. कोणतेही टँकर अगर लांब वाहतुकीकरिता १२,००० लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात सॉलवंड जमा करण्याची गरज असते. यासाठी हे भंगार व्यावसायिक कारखान्यातून उचललेले सॉलवंड अनधिकृतरीत्या गोदामात साठवतात. मात्र ते उष्णतेच्या अथवा ठिणगीच्या संपर्कात आल्यास पेट घेत असल्याचे गुरुवारी टेमघरच्या घटनेतून समोर आले आहे. निळ्या आणि लाल रंगाचा निघणारा ज्वालाग्रही पदार्थामुळे आग भडकत गेली. याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रहिवासी वस्ती आणि शाळेलगत असलेल्या या भंगार अड्ड्यामध्ये अग्नी कांडाचा तपास गांभीर्याने होणे गरजेचे आहे. दुपारी ३ वाजता लागलेली आग रात्री ८ ते ९ पर्यंत विझली नव्हती.तपास योग्य दिशेने गरजेचेतीन वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीतील हितकरी या कारखान्यातील टाकाऊ कार्पेटला आग लागली होती. त्यावेळी ९ ते १० कि.मी.पर्यंत अग्नीमुळे काजळी पसरली होती. ४८ तासांपेक्षा जास्त काळ या दुर्घटना स्थळावर पाणी मारण्याचे काम सुरु होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकाऊ कार्पेटची विल्हेवाट लावणेसंदर्भात दिलेल्या नोटिशीनंतर लागलेल्या आगीची गंभीर दखल औद्योगिक पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही. आणि हे प्रकरण पुढे जाऊन अकस्मात घटना या नावानेच बंद झाले.अशाच प्रकारे दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट महिन्यात एका भंगार अड्ड्यावर वायुगळती होऊन ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. महाड औद्योगिक वसाहतीने आॅगस्ट २०१५ मध्ये औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्व भंगार व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याबाबत नोटिशी बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांना या नोटिशीचा विसर पडल्याने भंगार व्यावसायिकांचे फावले आहे. याठिकाणी देशमुख कांबळे, बिरवाडी टॉकी कोंड, बिरवाडी आदर्शनगर, बिरवाडी कुंभार वाडा औद्योगिक वसाहतीतील रहिवासी क्षेत्र असलेल्या स्टेट बँक मागील भंगार व्यवसाय, राजेवाडी फाटा येथील भंगार व्यवसाय, टेमघर आणि जीते या दोन गावालगत आजही अनधिकृतपणे भंगार व्यवसाय सुरू आहेत. ग्रामपंचायतीवर कारवाईची गरजकाही दिवसांपूर्वी कोंडिवते येथील भंगार व्यावसायिकामुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यामध्ये रासायनिक पाणी शिरले होते. गुरवारी टेमघर येथील घडलेली घटना अशा दुर्घटना लक्षात घेता ज्या गाव हद्दीमध्ये रसायन हाताळणारे भंगार व्यावसायिक कार्यरत आहेत अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाईचे प्रस्ताव दाखल होणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रात रसायनाबाबत खुलासा करणारे तांत्रिक अधिकारी कार्यरत असतात, मात्र असे कोणतेच अधिकारी ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध नसल्याने घातक रसायन हाताळणाऱ्या भंगारवाल्यांना ना हरकत देणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ अगर संबंधित विभागाने ग्रामपंचायतीच्या विरोधात कारवाईची ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला नव्हते. मात्र भंगारामुळे होणारे अपघात आणि प्रदूषणानंतर विभागीय कार्यालयाने रसायन हाताळणी प्रकरणी भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे अधिकार दिले आहेत. यापुढे कारखान्याप्रमाणे भंगार व्यवसाय देखील प्रदूषण नियंत्रणाच्या कक्षेत असेल. - अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाडमहाड औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. - नंदकुमार सस्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महाड औद्योगिक पोलीस ठाणे