शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

गजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:58 PM

व्यवसाय ठप्प : किल्ले, धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने बंदच

मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळांना बसला आहे. पर्यटक येत नसल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडे-फार पर्यटक बाहेर फिराव्यास येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने ही ठिकाणे बंदच ठेवण्यात आली आहेत.

मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील बोट चालक व मालक प्रतीक्षेत आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी ३३ शिडाच्या बोटी, त्याचप्रमाणे मशीन बोट या एकाच जागेवर गेल्या मार्च महिन्यापासून बसून आहेत.एके काळी गजबजणारी राजपुरी व खोरा बंदर सुनेसुने झाले असून, या ठिकाणी निरव शांतता दिसून येत आहे. शनिवार-रविवार या दोन्ही जेट्ट्यांवर मोठी गर्दी असायची, परंतु येथे कोणीही फिरकत नसल्याने शांतता पसरली आहे. बोटींची रेलचेल, आॅटोरिक्षा, टांगा स्वारी, शहाळी विक्रेते, सरबत, टोपी व गॉगल विक्रेते दिसेनासे झाले आहेत. फक्त शांतता असून, एके काळी शेकडोंच्या संख्येने असणारी वर्दळ शांत झाली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड