शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मुरुडमध्ये अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:37 AM

मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते. मुरुड तालुक्यात नांदगाव, आगरदांडा, मुरुड शहर, आंबोली, माजगाव, सर्वे, काशीद, बोर्ली, भोईघर आदी ठिकाणी सुपारीची मोठी लागवड केली जाते. सुपारीचे उत्पादन वर्षातून एकदाच घेता येते; परंतु यंदा मुरुड तालुक्यात ४२२४ पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने सुपारी उत्पादनाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अतिवृष्टीमुळे सुपारीच्या झाडाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्याचप्रमाणे बुरशीची लागण झाल्याने यंदाच्या सुपारी उत्पादानात घट होणार आहे.मुरुड तालुक्यातील बागायत जमिनी फार मोठ्या प्रमाणात असून प्रत्येकाच्या एक एकरपेक्षा जास्त सुपारी व नारळाच्या मोठ्या बागायत जमिनी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भारतातील सुपारीला विशेष दर्जा असून चांगली मागणी आहे.यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याने सुपारीचे उत्पादन कमी प्रमाणात येणार असल्याचे असंख्य बागायतदारांनी सांगितले. जास्त पाऊस हा सुपारीला अनुकूल नसतो. मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज योग्य मानली जाते. एकट्या मुरुड तालुक्यात सुपारी उत्पादनाची साडेतीन कोटीची उलाढाल आहे.मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी-विक्री संघामुळे सर्व सदस्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे उत्तम काम या संस्थेद्वारे केले जाते; परंतु यंदा पावसाचे प्रमाण खूप वाढल्याने सुपारीला मोठी बाधा निर्माण झाली आहे.कोकणातील महत्त्वाच्या अशा सर्वच ठिकाणी अतिवृष्टीही झाल्याने मोठा धोका निर्माण होऊन सुपारी उत्पादनाचे प्रमाण कमी होणार आहे. काही ठिकाणी बुरशी तर काही ठिकाणी सुपारी गळून पडली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून वर्षभरातून येणारे उत्पादन वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडला आहे. निसर्गाने अवकृपा केल्याने या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यावे हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.मुरुड तालुक्यातील सुपारीच्या उत्पादनासाठी वर्षभरात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी शेणखत व असणारी विविध फवारणीसुद्धा करावी लागते. त्यानंतर झाडाची पूर्णवाढ झाल्यावर गर्द पिवळी अशी सुपारीची फळे तयार होतात; परंतु यंदा पावसामुळे काही शेतकऱ्यांनी फवारणी केली होती.पाऊस पडल्याने सर्व असणारे औषध वाया गेले आहे. बुरशीजन्य रोग झाल्याने झाडावरची सर्व सुपारी गळून जात असून सध्या झाडावर कोणतेही फळ दिसत नाही. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.सुपारीच्या उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काही ठिकाणी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुपारीच्या लागवडीसाठी मोठा खर्च होतो, परंतु उत्पादन कमी आल्याने झालेला खर्चसुद्धा सुटणार नाही. त्यामुळे शासनाने सुपारी बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी.- सचिन पाटील,बागायतदार, नांदगाव 

टॅग्स :Raigadरायगड