शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 2:10 PM

Taliye Landslide: तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे.

रायगड - मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदतकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे. डोंगराला भेग जाऊन दरड कोसळतेय हे दिसताच गावकरी घरे सोडून निघून जाण्यासाठी एकत्र आले असतानाच अचानक मातीचा ढिगारा खाली आला आणि यामध्ये सगळे गाडले, गेले अशी माहिती या आजोबांनी दिली. (... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience)

यासंदर्भातील वृत्त टीव्ही-९ मराठीने प्रसिद्ध केले आहे. दुर्घटनेत बालंबाल बचावलेल्या बबन सकपाळ नावाच्या आजोबांनी सांगितले की, संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास दुर्घटना घडली. वर दरड कोसळतेय म्हणून आरडाओरडा झाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो. मात्र आम्ही घरातून बाहेर पडत असतानाच वरून मातीचा ढिगारा आला आणि आजूबाजूची घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. आमच्या नव्या घराच्या मागे असलेलं आमचं जुनं घरही या दुर्घटनेत भुईसपाट झालं.

डोंगराला भेग जाऊन दरड कोसळणार असे वाटू लागल्याने गावातील लोक सावध झाले होते. सगळे एकत्र येऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. मात्र त्याचवेळी अचानक वरून दरडीची चिखल माती आली आणि सगळे गाडले गेले. सुदैवाने आम्ही लोकं जमले होते त्या दिशेला न जाता दुसऱ्या वाटेला गेलो त्यामुळे आम्ही बचावलो. पण तिथे जमलेले सगळे गाडले गेले. कुणीच जिवंत राहिला नाही, असे या आजोबांनी सांगितले.

आमच्या घरात आम्ही तीन माणसं राहतो. आम्ही तिघेही बचावलो. मात्र घरावर दगड माती येऊन पडली आहे. घरात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. घरातलं धान्य भिजून गेलं आहे. राहायला जागा नाही. आता मी कुटुंबाला घेऊन चार गुरांना घेऊन रानात राहतोय. खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे, अशी व्यथा या ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.  

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलनMaharashtraमहाराष्ट्र