शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

तरुणाईने सुरु केला "अन्नदान यज्ञ"! कोरोनाच्या लढाईत गरजुंना मायेचा घास....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 18:36 IST

शहरातील विविध भागात रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना देता फूड पँकेट

ठळक मुद्देयुवापिढीसमोरल एक नवा आदर्श, दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पँकेट देण्याची तयारी

पुणे: कोरोना काळात तरूणाई स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून स्वखर्चाने आणि स्वत:च्या हाताने जेवण तयार करून गरजुंना मायेचा घास भरवत आहे. या तरूणांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू करून युवापिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना ही एकट्या-दुकट्याची नव्हे तर सर्वांनी मिळून लढण्याची लढाई आहे. या तरूणांमध्ये कुणी डॉक्टर, वकील, तर आयटी इंजिनिअर आहेत. इतरांप्रमाणेच त्यांना देखील जीवाची भीती आहेच. पण त्याची पर्वा न करता समाजभान आणि संवेदनशीलतेतून त्यांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू केला आहे. 

याविषयी अँड अभिषेक जगताप यांनी ‘लोकमत’ला सांगितलं की, आम्ही सोसायटीतील वीस तरूण-तरूणींनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. सोसायटीमध्ये एक छोटासा हॉल आहे, तिथे आमच्यामधील सहा ते सात जण मिळून जेवण तयार करतात. त्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते. आम्ही सकाळी लवकर जाऊन मार्केटयार्ड येथून भाजीपाला आणतो, त्यानंतर भाजी निवडण्यापासून ते प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरूवात केली जाते. एका बॉक्समध्ये हे जेवण पँक केले जाते. आमच्यातलेच काही स्वयंसेवक स्वत: दुचाकीवर जाऊन शनिवारवाडा, कोथरूड, कँप आदी शहरातील विविध भागातील रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना पँकेट देण्याचे काम करतात. दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पँकेट तयार केली जातात.

सुरूवातीला आम्ही सर्वांनी पैसे गोळा केले आणि या उपक्रमाचा कामाचा श्रीगणेशा केला. आता अनेक मंडळी आम्हाला आपणहून पैसे देतात. पण आम्ही ते पैसे घेत नाही. उलट आम्हाला धान्य किंवा भाजीपाला आणून द्या आणि आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा असे सांगतो. याशिवाय आम्ही रस्त्यावर सोडलेल्या भाकड गाई, भटकी कुत्री, लहान पिल्लांना देखील खायला घालण्याचे काम करतो. हा उपक्रम हळू हळू वाढविण्याचा आमचा विचार आहे. या उपक्रमाला पोलिसांचे देखील सहकार्य मिळत आहे.

सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरच्या कुटुंबांना, मुलांना खायला काही मिळत नव्हते. किराणा मालाचे सामान दिले तर ते बनविणार कुठे? असा विचार मनात आला. मग आम्हीच जेवणाचे डबे तयार करून त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वकील अभिषेक जगताप यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSocialसामाजिक