शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:38 IST

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला : तरुणांनी कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे

ठळक मुद्देकोरोनामुळे जगभरात संकट निर्माण झाले असून सर्वांच्या पुढे भविष्याची चिंता

अतुल चिंचली - पुणे : जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या रोजगारावरही होणार आहे. अशा परिस्थितीत रोजगार मिळवण्यासाठी करिअरच्या उंबरठ्यावर असणारे तरुण चिंताग्रस्त अवस्थेत जाण्याची दाट शक्यता आहे. या वेळी तरुणांनी हतबल न होता आपल्यातील कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे, असा सल्ला मानसोपचारतज्ञ व चिकित्सा मानसशास्त्रज्ञांनी तरुणांना दिला आहे. कोरोनामुळे जगभरात संकट निर्माण झाले असून सर्वांच्या पुढे भविष्याची चिंता वाढवून ठेवली आहे. तरुण पिढी नेहमी भविष्याचा आधिक विचार करत असते. तरुणांनी नैराश्यात न जाता आशेचा किरण निर्माण होईल, या दृष्टीने विचार करावा. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यांच्याशी संवाद साधला.तरुणांमध्ये या कोरोनामुळे एकटेपणा आला आहे. तो एकटेपणा नसून एखादी सुवर्णसंधी समजून स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ अरुंधती खाडिलकर म्हणाल्या. त्यांनी सांगितले, की नोकरीशिवाय स्वत:च्या अंगी असणारे कलागुण, छंद ओळखण्यास सुरुवात करायला हवे. प्रत्येक छंद, कलागुण हा व्यवसाय होऊ शकतो. या दृष्टीने त्याकडे पाहावे. प्रत्येक कंपनीला शून्यातून उभे राहावे लागणार आहे. अशा वेळी कंपन्या कमी पगाराचा नोकरदार वर्ग घेणार. सद्य:स्थितीत कमी पगारावर काम करून एखादा व्यवसाय करणे गरजेचे आहे. कारण सर्व काही सुरळीत होईपर्यंत तरुणांना आर्थिक तडजोड महत्त्वाची आहे. सध्यातरी आशेचा किरण जागृत ठेवावा. ‘मी काही करू शकत नाही, मला मोठ्या पगाराचीच नोकरी पाहिजे, आता बेरोजगारी वाढणार’ या मानसिकतेत बदल करावा.

..............तरुणांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटवर असे आर्थिक संकट येणे, ही गंभीर बाब आहे. अशा वेळी तरुणांनी हतबल होऊन चालणार नाही. त्यांनी स्वत:च्या कौशल्यविकासाकडे लक्षकेंद्रित केले पाहिजे. या  परिस्थितीत प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देणे, हे कुठल्याही कंपनीला शक्य होणार नाही. परिस्थिती सुधारेपर्यंत कौशल्यविकासाचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा. आपली धकाधकीच्या जीवनात जे ठरवून दिले आहे, तेच काम करण्याची मानसिकता झालेली असते. - अरुंधती खाडिलकर, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ.................कोरोनामुळे काही कालावधीनंतर अनेक प्रश्न भेडसवणार आहेत. तरुणांना अशा वेळी करिअरबाबतीत असुरक्षित वाटू शकते. स्पर्धात्मक युगात लवकरात लवकर पैसे कमवून पस्तिशीनंतर आरामशीर जगा, असे त्यांच्या मनात बिंबवले जात आहे. त्यांना पैसा, श्रीमंती अशी स्वप्ने दाखवून कलागुणांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडले जाते. भविष्यात नवीन मार्ग शोधण्याची हीच ती वेळ आहे.- डॉ. मोहन आगाशे, मानसोपचारतज्ज्ञ............... 

टॅग्स :PuneपुणेCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरीEconomyअर्थव्यवस्था