शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम’ रचनेची यंदा शताब्दी वर्षपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:00 IST

आज प्रजासत्ताक दिनी शंभर वर्षांपूर्वीची प्रचलित चाल ऐकण्याची पुणेकरांना संधी

ठळक मुद्देआजपर्यंत या गीताला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायकांनी विविध रागांमध्ये केले स्वरबद्ध प्रजासत्ताक दिनी सकाळी 10 वाजता गांधर्व महाविद्यालयात गायन

नम्रता फडणीस

पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या  ‘वंदे मातरम’ या रचनेला  यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी प्रचलित केलेल्या या राष्ट्रगीताची जुनी चाल ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. उद्या (26 जानेवारी)प्रजासत्ताक दिनी सकाळी 10 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिर येथे हा योग जुळून आला आहे. ’वंदे मातरम’चे  सूर कानावर पडताच देशभक्तीसह मातृभूमीसमोर नतमस्तक होण्याची भावना मनात संप्रेरित होते. देशाप्रति जाज्वल्य अभिमानाचे स्फुरण चढते. बकिमचंद्र चँटर्जी यांनी शब्दबद्ध केलेले ’वंदे मातरम’ गीत  ‘देस’ रागात रचले गेले आहे हे सर्वश्रुत आहेच. आजपर्यंत या गीताला भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायकांनी विविध रागांमध्ये स्वरबद्ध केले. मास्तर कृष्णराव यांनी  ‘वंदे मातरम’ ची रचना झिंजोटी रागात गुंफली. मात्र सर्वप्रथम 1920 च्या सुमारास  पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी  ‘काफी’ रागात ही रचना बांधली.  या रागातून शरणागत भाव प्रतीत होईल असे त्यांचे ठाम मत होते. स्वत: पं. पलुसकर ही रचना स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहून सादर करीत होते. जाहीर सभेनंतर  ‘वंदे मातरम’ म्हणण्याची प्रथा  पलुसकरांनी सुरू केली. त्या नंतर त्यांचे शिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन ही रचना लोकमान्य टिळकांच्या सभांमध्ये सादर करीत असत. या रचनेला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजासत्ताक दिनी संगीताचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांना या गीताद्वारे मानवंदना आणि आदरांजली वाहिली जाणार असल्याचे पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या आणि माधुरी संगीत विद्यालयाच्या संचालिका  गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांनी  ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ‘नादमाधुरी’ या आमच्या यू ट्यूब चॅनलवरून हे गीत प्रदर्शित होणार असून, पं. शौनक अभिषेकी आणि धनश्री गणात्रा यांनी हे गीत गायले असल्याचेही त्या म्हणाल्या.     पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांचे हिंदुस्थानी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी जी स्वरलिपी तयार केली ती आज  ‘पलुस्कर पद्धती’ म्हणून ओळखली जाते. 1901 साली पलुस्कर यांनी लाहोर येथे  ‘गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर  पलुस्कर यांनी  त्यांचे शिष्य पं. यशवंतबुवा मिराशी, पं. विनायकराव पटवर्धन, शंकर व्यास, बी.आर देवधर, ओंकारनाथ ठाकूर, शंकरराव बोडस यांना भारतातल्या विविध ठिकाणी हिंदुस्थानी संगीताचा प्रचार करण्यास पाठवले. संपूर्ण भारतात त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. त्यानुसार पं. विनायकबुवा पटवर्धन यांना पुण्यात पाठवले आणि त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. आमचे गुरू पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी आम्हाला ‘वंदे मातरम’ ची शंभर वर्षांपूर्वीची ही प्रचलित चाल शिकविली आणि हा अनमोल ठेवा आमच्या पिढीकडे सुपूर्त केला. प्रजासत्ताकदिनी जुन्या चालीवर आधारित  ‘वंदे मातरम’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे ही यामागील इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेVande Mataramवंदे मातरमmusicसंगीतRepublic Dayप्रजासत्ताक दिन