शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 19:10 IST

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे...

पुणे : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जाते आहे. मात्र  याप्रकरणी महाविकास आघाडीतील नेते मात्र सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. पण आता शिवसेनेच्या नेत्यानेच पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. 

महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीने रविवारी( दि. ७) घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. ही घटना आत्महत्या आहे की हत्या अशी शंका घेतली जात आहे. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे काही कॉल रेकॅार्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॅाप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सामंत म्हणाले,पूजा चव्हाण प्रकरणी राठोड समोर का येत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण याबाबत तपास सुरु आहे. अहवाल सादर केलेला आहे अशीही माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे मी आणखी काही बोलणं योग्य नाही. असे म्हणत पूजा चव्हाण प्रकरणावर जास्त भाष्य करणे टाळले आहे. 

विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे... राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपने आम्ही सर्वाधिक जागा जिंकू असा दावा केला होता. तसेच राज्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचेच सर्वाधिक सरपंच व उपसरपंच बसलेले पाहायला मिळतील असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचेच ग्रामपंचायत व सरपंच निवडीवर वर्चस्व राहिल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप व त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत देखील सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. 

 

टॅग्स :PuneपुणेSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणDeathमृत्यूUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना