शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

का उगाच तोंडाची गटारे उघडताय? पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनबाबत मनसेच्या वसंत मोरेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 6:16 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरंदरेंचे अस्थी विसर्जन किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु होती

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. याच वर्षी १४ ऑगस्टला पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु बाबासाहेबांनी शंभरी पूर्ण न करताच यावर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. असंख्य राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्ष आणि नागरिकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांचे उत्तम व्यंगचित्र काढून श्रद्धांजली वाहिली.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरंदरेंचे अस्थी विसर्जन किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु होती. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याचे वृत्त माध्यमात आहे. त्यावरुन, अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही यावरुन खोचक शब्दात टीका केली आहे. मात्र, मनसेनं हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केले आहे.  

''खरे तर मेल्यानंतर वैर संपते.ब.मो पुरंदरेंनी छ.शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची बदनामी केली आहे.ब.मो.पुरंदरेंच्या अस्थी विसर्जन गडकिल्यांवर करण्यापेक्षा रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयात करावे. छत्रपतींचे गडकिल्ले आम्हां बहुजनांना प्रेरणा देतात. असे ट्विट वरपे केले आहे. त्यावर निशाणा साधत पुणे शहर मनसे अध्यक्ष वसंत मोरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून खुलासा केला आहे.''  

वसंत मोरेंचा खुलासा 

''काही नालायकांना इतकी आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची काळजी वाटते ना, तर आरे किती तरी परमिट रूमला, लॉजला, दारूच्या दुकानांना ही छत्रपतींनी मोठ्या कष्टाने तयार केलेल्या किल्यांची नावे आहेत. तिकडे तुमची मर्दुमकी दाखवा की का उगाच तोंडाची गटारे उघडताय. "राजगड" हे आमच्या ऑफिसचे ही नाव आहे. आणि पवित्र अपवित्र ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? असे म्हणत मोरे यांनी खुलासा केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस