शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 1:38 PM

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंगे उतरवण्याबाबत कडक भूमिका मांडली

पुणे : औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंगे उतरवण्याबाबत कडक भूमिका मांडली आहे. मागील सभेत त्यांनी ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. यावेळी राज ठाकरे यांनी रमजानमध्ये अडथळा येऊ नये या दृष्टीने ४ तारखेपर्यंत भोंगे उतरवण्यास सांगितले आहेत. त्यांनी न ऐकल्यास मशीदसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल. असा सज्जड इशारा त्यांनी सभेत दिला आहे. त्यावेळी भोंगे उतरवण्याबाबत राज यांनी सर्व प्रार्थना स्थळांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये मशिदीवरील भोंगे उतरवल्यावर इतर प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत असे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्यावर पुण्यातून ब्राह्मण महासंघाने आपली भूमिका मांडली आहे. सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.    

हिंदू धर्मात गणेशोत्सव, दिवाळी, दहीहंडी, नवरात्री, ग्रामदैवत यात्रा, उरूस, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, असे असंख्य सण साजरे केले जातात. हे सार्वजनिक रित्या साजरे केल्याने रस्त्यावर मांडव टाकून उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी स्पिकरही लावले जातात. राज ठाकरेंनी काल रस्त्यावर नमाज पठाण करणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. मग आपल्या सणांचं काय होणार असा सवाल  ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.   

राज ठाकरेंनी वक्तव्याचा  वक्तव्यांचा पुनर्विचार करावा

राज ठाकरे यांनी मशिदीचा उल्लेख तुम्ही तुमचे भोंगे बंद करा, मग आम्ही आमचे करू असे सांगितले होते. मात्र आपल्याकडे वर्षभर साजरे होणाऱ्या सणांमध्ये धार्मिक विधीसाठीसुद्धा लाउडस्पीकर लावले जातात. त्यामुळे आपणही सर्व संकटात येऊ शकतो. ते बंद करतात म्हणून आपले सण, परंपरा आपण बंद करणे योग्य ठरेल का, असा सवाल दवे यांनी केला आहे. नमाज एका मर्यादेपर्यंत किंवा दिवसापुरते मर्यादित असते. मात्र आपले सण वर्षभर होत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली वक्तव्ये पाहून त्याचा पुनर्विचार व्हावा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेTempleमंदिरMuslimमुस्लीमHinduहिंदू