शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय करतंय? अधिवेशनात धंगेकरांचा सवाल

By राजू हिंगे | Updated: July 3, 2024 18:41 IST

पाणीटंचाईच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा

पुणे: पावसाला सुरू असून सुद्धा पुण्याच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. २४ बाय ७ पाणी योजना रखडली आहे. काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाय योजना करीत आहे , असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशन पुण्याचा पाणी प्रश्न मांडून आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. धंगेकर म्हणाले, मी सातत्याने पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे सरकारचे, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह पुणे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.‌ पुण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. त्यातच स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत चालली आहे. म्हणून समान पाणीपुरवठा योजनेकडे आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. टँकर माफियावर नियंत्रण आणले पाहिजे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे रोगराई वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. पण सरकार पावले उचलताना दिसत नाही अशी नाराजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

पुण्यासाठी २१ टीएममसी पाणी साठा मंजूर करा

वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला पाणीटंचाईची झळ भासत आहे. त्यामुळे पालिकेने पुरेशा पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण, तत्कालीन राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुणेकरांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांना अतिरिक्त पाणी मंजूर होणे हेही आवश्यक होते. पण, अद्याप वाढीव पाणीसाठा शासनाने मंजूर केला नाही. याचेही परिणाम पुणेकरांना सोसावे लागत आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसwater shortageपाणीकपातBJPभाजपाRainपाऊस