शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय करतंय? अधिवेशनात धंगेकरांचा सवाल

By राजू हिंगे | Updated: July 3, 2024 18:41 IST

पाणीटंचाईच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा

पुणे: पावसाला सुरू असून सुद्धा पुण्याच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. २४ बाय ७ पाणी योजना रखडली आहे. काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाय योजना करीत आहे , असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशन पुण्याचा पाणी प्रश्न मांडून आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. धंगेकर म्हणाले, मी सातत्याने पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे सरकारचे, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह पुणे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.‌ पुण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. त्यातच स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत चालली आहे. म्हणून समान पाणीपुरवठा योजनेकडे आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. टँकर माफियावर नियंत्रण आणले पाहिजे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे रोगराई वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. पण सरकार पावले उचलताना दिसत नाही अशी नाराजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

पुण्यासाठी २१ टीएममसी पाणी साठा मंजूर करा

वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला पाणीटंचाईची झळ भासत आहे. त्यामुळे पालिकेने पुरेशा पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण, तत्कालीन राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुणेकरांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांना अतिरिक्त पाणी मंजूर होणे हेही आवश्यक होते. पण, अद्याप वाढीव पाणीसाठा शासनाने मंजूर केला नाही. याचेही परिणाम पुणेकरांना सोसावे लागत आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसwater shortageपाणीकपातBJPभाजपाRainपाऊस