शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 1:13 PM

पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते.

ठळक मुद्देमतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीतमतदान कमी होण्यामागे अनेक कारणे मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधितमतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवेमतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण

पुणे : मतदानाची पुण्यातली टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा घसरली याचा दोष पुणेकरांचा नसून खासदार होऊ पाहणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचा असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधून व्यक्त झाली. पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते. प्रचारामध्ये चुरस नसल्यानेही पुणेकरांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली असेल, असे सांगण्यात येत आहे. 

काही पुणेरी प्रतिक्रियापुणेकरांना दोष देणे चुकीचे ‘‘मतदान कमी झाल्याने आभाळ कोसळले, असे मानण्याचे कारण नाही. नुकत्याच परीक्षा संपल्याने सुट्ट्यांचा काळ आहे. अनेक दुबार, स्थलांतरीत, मयत लोकांची सुमारे १० टक्के नावे मतदार यादीत असल्याने मुळातच मतदारसंख्या जास्त दिसते. महत्त्वाचे म्हणजे मतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीत. तरीही ५० टक्के पुणेकर स्वत:हून मतदानाला बाहेर पडले, ही चांगली बाब आहे.’’-ज्येष्ठ राजकीय नेते अंकुश काकडे, नवी पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर. 

पुणेकरांना आव्हान देऊ नये‘‘पुणेकरांचे मतदान कमी पडले, ही वस्तुस्थिती आहे. अधिक मतदान झाले असते तर मला ते आवडले असते. पण मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोचले नाहीत. प्रचारात चुरस नव्हती. त्यामुळे घसरलेल्या मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधित आहे.’’-पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लोकमाान्य नगर, दोन पिढ्यांचे पुणेकर. दोष राजकीय पक्षांचा‘‘उमेदवारांबद्दलचा भ्रमनिरास, उमेदवारांबद्दलची नाराजी यामुळे मतदार घरी बसले. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का हे पुणेकरांचे अपयश नसून राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाली तरच मतदारांमध्ये उत्साह दिसतो. त्यामुळे आत्मपरिक्षण पुणेकरांनी नव्हे तर राजकारण्यांनी करावे.’’-राजकीय नेते अजय शिंदे, सदाशिव पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर.

अस्सल पुणेकरच कमी झाले‘‘मतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवे. मतदान न करणा-यांमध्ये अस्सल पुणेकर किती आणि बाहेरुन पुण्यात स्थायिक झालेले किती, याबाबत नेमका अंदाज येणे अवघड आहे. पुण्यात अस्सल पुणेकरांचा टक्का घसरल्याने मतदानाचाही टक्का घसरला आहे.’’-व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, कोथरूड, तीन पिढ्यांचे पुणेकर

‘लाल फिती’ला वैतागले पुणेकर‘‘मतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण आहे. अनेक नागरिक मतदान केंद्रांपर्यंत गेले. मात्र, खूप प्रयत्न करुनही त्यांना यादीत नावेच सापडली नाहीत. याआधी अनेकदा मतदान करुनही अचानक यादीतून नावे गायब झाली. सत्ता कोणाचीही असली तरी प्रशासनातील अनास्था कायम आहे. तीन-चार वेळा दुरुस्तीसाठी अथवा बदलासाठी अर्ज करुनही यादीत बदल झालेले नाहीत. हुज्जत घालूनही नावे न मिळाल्याने नागरिक वैैतागले. त्यामुळे पुणेकर घराबाहेर पडलेच नाहीत, असे म्हणता येत नाही.-लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे, सिंहगड रस्ता, दोन पिढ्यांचे पुणेकर

चौकटपुण्याचा इतिहाससन १९६७ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्या वर्षी झालेले ६९.६४ टक्के मतदान हे पुण्यातले आजवरचे सर्वोच्च होय. तर पुण्याच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान सन २००९ मध्ये ४०.६६ इतके झाले. त्यावर्षी सुरेश कलमाडी कॉंग्रेसकडून विजयी झाले. दरम्यान, गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातल्या मतदानाची टक्केवारी ५५ च्या पुढे गेलेली नाही.   

चौकटसोशल मीडियातली शेलकी शेरेबाजी-‘पुणे मतदानात उणे’-‘पुणेकरांनी इतरांना शहाणपणा शिकवणाच्या जन्मजात हक्काबाबत शंका निर्माण केल्या आहेत’-‘पुणेकर १ ते ४ झोपले की काय?’-‘पुस्तक दिनी पुणेकर वाचनात इतके रमले की मतदान करायला विसरले’-ज्यांना स्वत:चे मत असते तेच देतात-दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याची टक्केवारी १००; मतदानाची मात्र ५० च.

 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानBJPभाजपाcongressकाँग्रेस