शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:58 IST

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती

किरण शिंदे 

पुणे : आपल्या शाळेतील 10 पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने याला आपणच कारणीभूत असल्याची अपराधीपणाची भावना मनात दाटल्याने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचललं. या शिक्षकाने वर्गातच विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील होले वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. अरविंद देवकर असं या शिक्षकाचं नाव आहे.

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अरविंद देवकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी आयुष्य संपवण्यामागील कारणे सविस्तर लिहून ठेवले आहेत..या चिठ्ठीत त्यांनी लिहिलंय कि, जून महिन्यात सुरुवातीचे तेरा दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकलो नाही कारण, एक शिक्षकी शाळेत काम करत असताना मी बावरून गेलो होतो. विद्यार्थ्यांकडून लेखन विद्यार्थ्यांशी ओळख, गप्पा, गाणी, गोष्टी मैदान साफसफाई या कामातच वेळ गेला. त्यात विद्यार्थ्यांकडून मी आणि विद्यार्थी शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली. त्यातच शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर कणकण आल्याने जेवणाच्या सुट्टीमध्ये गोळी घेऊन आराम करत होतो. यादरम्यान एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. माझ्या या सर्व चुकांमुळे शाळेतील दहा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांनी खालच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर शाळेत एकच पहिलीतील विद्यार्थी राहिला. या घटनेनंतर मी पालक वर्गाची माफी मागून, विनंती करून फक्त एकच संधी द्या अशी विनवणी केली होती. मात्र मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली. विद्यार्थी शाळा सोडून जाण्यास सर्वस्वी मीच जबाबदार असल्याची भावना खोलवर रुजल्याने शिक्षण मंदिरात देहाचा त्याग करण्याचे ठरवले, यास कोणासही जबाबदार धरू नये.

आतापर्यंत 19 वर्ष सेवा झाल्याचेही अरविंद देवकर यांनी चिट्ठीत नमूद केले. यापूर्वीच्या शाळेत चांगले सहकारी शिक्षक लाभल्याने सेवा चांगली झाली. मात्र खोली वस्ती येथील शाळा एक शिक्षकी असल्याने कामाच्या गोंधळात मी सुरुवातीला बावरून गेलो होतो. त्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने पालक वर्गाची मने जिंकता आली नाहीत. असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं. तीन ऑगस्टला त्यांनी प्राथमिक शाळेच्या वर्गातच विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आठ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाEducationशिक्षणDeathमृत्यू