शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:37 IST

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांवर तरी पाणी विसर्ग सुरूचइंदापूरकरांना करावी लागणार पाण्यासाठी पायपीट

इंदापूर :उजनी धरण उशाला अन कोरड घशाला ही बाब इंदापूरकरांना नवीन  नाही. परंतु, गेल्या वर्ष-सव्वा वर्षात राज्यात कोरोना महामारीचे संकट, शासनाचा लाॅकडाऊन व अतिवृृृष्टी व अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.तर कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवुन ठेपल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि १०) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासुन सुरू आहे.तर सध्या उजनीतुन एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे. इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे. सोलापूर व उजनीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आले असल्याने सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. पण धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आधीच आर्थिक संकटाने पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्‍यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीDamधरणUjine Damउजनी धरणSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगर