शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:37 IST

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांवर तरी पाणी विसर्ग सुरूचइंदापूरकरांना करावी लागणार पाण्यासाठी पायपीट

इंदापूर :उजनी धरण उशाला अन कोरड घशाला ही बाब इंदापूरकरांना नवीन  नाही. परंतु, गेल्या वर्ष-सव्वा वर्षात राज्यात कोरोना महामारीचे संकट, शासनाचा लाॅकडाऊन व अतिवृृृष्टी व अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.तर कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवुन ठेपल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि १०) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासुन सुरू आहे.तर सध्या उजनीतुन एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे. इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे. सोलापूर व उजनीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आले असल्याने सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. पण धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आधीच आर्थिक संकटाने पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्‍यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीDamधरणUjine Damउजनी धरणSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगर