शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:54 IST

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे

बाभुळगाव: भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन उद्या मंगळवारी (दि.८) सकाळी ९ वाजता उजनी धरण विद्युतगृह मधून सुरुवातीस १६०० क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येणार असून आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून ६००० क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याचे पाणी योजनांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे. असे भीमा नदी काठच्या नागरीकांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे. सद्या उजनी धरणातून सीना-माढा योजना ३३३ क्युसेक, दहिगाव १२० क्युसेक, बोगदा ८१० क्युसेक व मुख्य कालवा २९५० क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. 

आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार 

तुर्तास तरी भीमा नदी काठच्या नागरिकांची चिंता मिटली असली तरी उजनी धरणातील पाणी स्थिती पाहता आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत असल्याचे नदीकाठच्या शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊसTemperatureतापमान