शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 9:09 PM

शेतकऱ्यांचे आंदोलन पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. 

ठळक मुद्देभामा-आसखेड धरण : आंदोलन आणखी चिघळणारभामा-आसखेडला छावणीचे स्वरूप 

खेड : पाईट( ता. खेड ) येथील धरणग्रस्त आंदोलकांनी तीन दिवसांपूर्वी बंद केलेले भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आवर्तन सोमवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. यात १00 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आंदोलक संतापले असून, मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन  पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. ५ एप्रिल रोजी धरण प्रशासनाने सोडलेले आवर्तन शेतकऱ्यांनी ६ एप्रिलला बंद केले होते. यावर भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने १११ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. आज भामा-आसखेड सिंचन विभाग उपविभाग करंजविहिरे, यांनी पाणी सोडण्याची सर्व तयारी करुन सकाळी ११ वाजता सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते लोंढे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, शाखा अधिकारी भारत बेंद्रे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकण पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, मंडल अधिकारी हरिचंद्र सोनवणे आदींच्या उपस्थितीत पुन्हा पाणी सोडण्यात आले. सायंकाळी पाणी सोडण्याचा वेग वाढवून ८०० क्युसेक्सवर नेला होता. आवर्तन १५ दिवस सोडण्यात येणार आहे. यामध्ये खेड तालुक्यातील १० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून शिरूर व हवेली तालुक्यातील ४ आणि दौंड तालुक्यातील ४ बंधारे भरण्यात येणार आहेत. 

भामा-आसखेडला छावणीचे स्वरूप भामा-आसखेड धरणावर धरणग्रस्तांच्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. यामध्ये २ सीआरपीएफच्या तुकड्या, १ जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी व १४ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे . या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

 

टॅग्स :KhedखेडDamधरणPoliceपोलिसFarmerशेतकरी