शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 8:45 PM

नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो...

ठळक मुद्देसुप्रिया सुळे-रणजित निंबाळकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेटजलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले

पुणे : नीरा देवघर धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून बारामती-सोलापूरला दिल्या जाणाऱ्या पाणी कोट्याचे वादंग सुरु असतानाच बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोमवारी (दि.१०) जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. तसेच, नीरा कालव्यासह आपापल्या मतदारसंघातील पाणी पुरवठ्याच्या कामांचा आढावा घेतला. नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो. त्यातील जवळपास ६० टक्के पाणी बारामती परिसराला जाते. त्याचा करार २०१७ साली संपुष्टात आला. तसेच, जलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले आहे. माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला अधिक पाणी जात असल्याचा दावा करत नवा करार करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नीरा देवघर प्रकल्पामधून निरा डाव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत चर्चा केली. नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला मिळणारे अतिरिक्त पाणी थांबविण्याची शिफारस महाराष्ट्र कृष्णा खोरे व विकास महामंडळाकडून राज्यशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.निरा देवघर धरणातील पाणी हे निरा डाव्या कालव्यातून बेकायदेशीररित्या बारामती परिसराला दिले जात होते. त्यामुळे निरा डाव्या कालव्याच्या अंंतर्गत असलेले फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी पाणी मिळत होते. यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणी साठा आणि विंधन विहिरींचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांच्यासह पुरंदर, बारामती, मुळशी, भोर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.  मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी येथील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेmadha-pcमाढाBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणी