शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

आयडियाची कल्पना! मुलांचा अभ्यास व्हावा म्हणून अख्खं गावच बनलं आहे शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:12 IST

तरुण आणि शिक्षकांची संकल्पना

लॉकडाऊन मध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि त्यामुळे होणारं नुकसान हा आता काळजीचा मुद्दा ठरला आहे.त्यातच जिथे नेटवर्क आहे तिथे किमान ऑनलाईन अभ्यास तरी सुरू आहे. पण ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही आणि शाळाही बंद तिथे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. याच प्रश्नावर उत्तर शोधलं आहे ते भोर तालुक्यातल्या म्हाळवाडी गावातल्या तरुणांनी. या तरुणांनी एक भन्नाट कल्पना शोधली. त्यांनी अख्ख्या गावाचीच शाळा बनवली. 

"मुलं शाळेत जात नसल्यामुळे त्यांचं नुकसान होतंय हे दिसत होतं. पण यावर पर्याय काय हे सुचत नव्हतं.मग विचार केला की शाळेतल्या भिंतींसारखे जर घरांचा भिंतींवर धडे लिहिले तर? गावातल्या सगळ्या लोकांनीच ही संकल्पना उचलून धरली. मग शिक्षकांशी चर्चा झाली आणि मग काय काय रंगवायचं ते ठरवलं. त्यानंतर गावातले पेंटर पुढे आले. आणि मग सुरू झालं ते भिंती रंगवणं "या सगळ्या साठी पुढाकार घेणारे राजेश बोडखे सांगत होते. 

या सगळ्याला येणार लाख दीड लाखांचा खर्च देखील बोडखेनी उचलला. आणि मग घरांचा भिंती रंगल्या विज्ञान गणित इतिहास भुगोलापासून ते अगदी फोनेटिक्स पर्यंत अनेक धडे भिंतींवर रंगले आहेत. गावातल्या जवळपास 85 घरांचा भिंती आता या रंगात रंगल्या आहेत. 

शिक्षकांना सुद्धा या प्रकल्पाचा खूप फायदा झाला आहे.या शाळेत शिक्षक असणारे गणेश बोरसे म्हणाले "इथे गावात नेटवर्क ची अडचण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला अडचण येत होती.आम्ही मुलांकडे जायचो पण त्यात दिवसाला पाच ते सहा मुलं कव्हर व्हायची. त्यामुळे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हा पाढे, काही धडे, असा सगळं रंगवून घेतलं. बेस तयार असेल तर पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल हा यामागचा हेतू होता. या बरोबरच आम्ही अभ्यास मित्र तयार केले आहेत. म्हणजे मोठी मुलं लहान मुलांना शिकवतात. या चित्र आणि अभ्यासमित्रांचा माध्यमातून मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत". 

एक अभ्यासाचं गाव तर तयार झालंय. पण आता आजूबाजूचा गावांमध्ये ही हा प्रकल्प राबवायचा विचार असल्याचं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे म्हणाले.एकूणच सध्या अख्खं म्हाळवाडी गावच अभ्यासात रंगलंय. 

टॅग्स :Schoolशाळाpaintingचित्रकलाEducationशिक्षणonlineऑनलाइन