शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मान्सूनमध्ये पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 8:17 PM

या मान्सूनमध्ये पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना तुम्ही आवर्जुन भेट देऊ शकता.

पुणे : मान्सून सुरु झाला की विविध ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅन केले जातात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक नवनवीन ठिकाणांचा शाेध घेत असतात. मान्सूनमध्ये डाेंगर हिरवी चादर पांघरत असल्याने ते दृष्य प्रत्येकाच्या ह्रद्याचा ठाव घेत असते. तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून काेसळणारे धबधबे प्रत्येकाच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले. या किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवाची, महाराजांच्या पराक्रमाची आपल्याला माहिती मिळते. त्याचबराेबर मान्सून मध्ये या किल्ल्यांवरुन दिसणारं दृश्य नयनरम्य असतं. त्यामुळे या मान्सूनमध्ये तुम्ही पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना नक्कीच भेट देऊ शकता. 

1) सिंहगडगड आला पण सिंह गेला हे शिवाजी महाराजांचे उद्गार आपल्या सर्वांनाच माहित आहेत. मुघलांच्या ताब्यातून सिंहगड मिळवताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. शिवाजी महाराजांचा सिंहासारखा लढवय्या मावळा या लढाईत मारला गेल्याने त्याच्या पराक्रमाची ओळख म्हणून पूर्वीच्या काेंढाणा किल्ल्याचे सिंहगड असे नामकरण करण्यात आले. पुण्यापासून अवघ्या 25 ते 30 किलाेमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावरुन नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सिंहगडावरुन संपूर्ण पुणे शहर आपल्या दृष्टीस पडते. सिंहगडाच्या दरवाज्यापर्यंत तुम्ही गाडीवर देखील जाऊ शकता. किंवा ट्रेकिंगचा ऑप्शन आहेच. सिंहगडावर गेल्यावर तिकडची भजी आणि पिठलं खायला विसरु नका. 

2) राजमाची किल्लापुण्यापासून 50 ते 60 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे. लाेणावळा आणि खंडाळ्याच्या मध्ये असणारा राजमाची किल्ला नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारा निसर्ग स्वर्गाची अनुभूती देऊन जाताे. गडावरील लेण्या आणि मंदिर तुम्हाला इतिहासात घेऊन जातात. ट्रेकर्सचा हा आवडता किल्ला आहे. अनेकजण किल्ल्यावर कॅपींग सुद्धा करतात. त्यामुळे पावसाळ्यात कुठे बाहेर जायचा विचार करत असाल तर राजमाची किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे. 

3) शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे शिवप्रेमींच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळताे. गाडीने आपण किल्ल्यावर जाऊ शकताे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारं दृश्य खूप सुंदर असते. पुण्यापासून 70 ते 75 किलाेमीटरवर हा किल्ला आहे. त्यामुळे तुम्ही टु व्हिलरवर सुद्धा जाऊ शकता. 

4) रायगड शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगड बांधला. समुद्र सपाटीपासून 820 मीटर इतक्या उंचीवर रायगड आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड ओळखला जाताे. रायगडावरुन स्वराज्यावर नजर ठेवली जात असे. गडावर महाराजांची समाधी पाहायला मिळते.  त्याचबराेबर गडावर जगदीश्वराचे मंदीर व वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आहे. स्वराज्य द्राेह करणाऱ्याला याच गडावरील टकमक टाेकावरुन दरीत फेकण्यात येई. हिरकणीची कथा आपण सगळेच जाणताे. जाे बुरुज उतरुन हिरकणी  गेली हाेती ताे बुरुज सुद्धा आपल्याला या गडावर पाहायला मिळताे. रायगडावर माेठी बाजारपेठ हाेती. त्या बाजारपेठेचे अवशेष अजूनही गडावर आहेत. राेपवेच्या माध्यमातून गडावर जाता येते. त्याचबराेबर गडावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. राजगड ते रायगड असा ट्रेक अनेक ट्रेकर्स करतात. महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला हाेता. पुण्यापासून 85 ते 90 किलाेमीटरवर हा किल्ला आहे. 

5) राजगड गरुडाने पंख विस्तारल्यावर जसा आकार दिसताे, तशा आकाराचा हा किल्ला आहे. राजगड हा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जाताे. किल्ल्याच्या तिन्ही माच्या पाहण्यासारख्या आहेत. गडाचा हत्ती बुरुज देखील प्रेक्षणीय आहे. किल्ल्यावरुन सुर्याेदय सुंदर दिसताे. किल्ला चढून जावा लागताे. पावसाळ्यात किल्लायावरचे दृश्य पाहण्यासारखे असते. पुण्यापासून 60 ते 65 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 

टॅग्स :PuneपुणेFortगडenvironmentवातावरणhistoryइतिहास