शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केलेल्या 'जित्राबां'ना पक्षात पुन्हा प्रवेश नाही : अजित पवारांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 19:23 IST

स्टेजवर बसलेल्यांनी एक दिलाने काम केले असते तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते

इंदापूर : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजुला ठेऊन विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टिका करताना ते म्हणाले, जे भाजप शेतकयांच्या मुळावर उठलेले आहे अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे.  मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बºयाच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. जर एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते.

राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले आप्पासाहेब जगदाळे यांच्यावर टिका करताना पवार म्हणाले, जिल्हा बॅँक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद अशी पदे जनतेची कामे करण्यासाठी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजुला ठेऊन विरोधकांचे काम केले. ते जिकडे जातील तिकडचा पराभव होतो. त्यांचा पायगुणच तसा आहे. अशा जित्राबांना आता पक्षात प्रवेश नाही. यांनी कितीही नाही म्हणू द्या, मी नाहीच घ्यायचो म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. तुम कुश्ती करो, हम कपडे सांभालेंगे असे नाही झाले पाहिजे.आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली आहेत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. टोप्या फिरवून नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहा.

 इंदापूर शहरवासीयांनी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली तर विकासच करून दाखवतो. नाहीतर नावाचा अजित पवार नाही असा शब्द देखील त्यांनी दिला. ते म्हणाले,  इंदापूर तालुक्याची पंचायत समिती आपल्या ताब्यात नसताना देखील, जिल्हा परिषदेतील महत्त्वाची सभापतिपदे आपण इंदापूर तालुक्याच्या वाट्याला नेहमी दिलेले आहेत. त्यामुळे यंदा इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसची आली पाहिजे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत समिती संदर्भात निधी देणारी सर्व यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची आहे. त्यामुळे गावातील कोणीही गाफिल न राहता इंदापूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची निर्माण करा.

 

टॅग्स :IndapurइंदापूरPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस