शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

दिवाळीनंतर विषाणूजन्य ‘ताप’ श्वसनविकार, पोटाच्या तक्रारी; मास्क वापरण्याचा सल्ला

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 21, 2023 3:55 PM

सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम

पुणे: दिवाळीत फाेडलेले फटाके तसेच फराळाचे तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे माेठयांसह लहान मुलांमध्ये श्वसनविकार, पाेटाच्या तक्रारी व विषाणूजन्य ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढली आहे. यासाठी काही काळजी घेण्यासह संतुलित आहाराचे सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

दिवाळीतील फटाक्यांमुळे मुलांसह माेठयांना श्वसनविकाराची समस्या वाढली आहे. फटाक्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रदूषकांच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्यानंतर मुलांना दमा किंवा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांचा त्रास उद्भवू शकतो. मोठा आवाज आणि मोठ्या प्रमाणातील प्रकाशाने डोकेदुखी, मानसिक ताण आणि झोपेसंबंधीच त्रास हाेत असल्याचेही दिसून आले आहे. तसेच या सणासुदीच्या काळातील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही दिसून आलेले आहे.

मिठाई व तळलेल्या पदार्थाचा परिणाम

या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि तळलेले फराळाचे पदार्थ यांची रेलचेल असते. यावर चांगलाच तावही मारला जाताे. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे संपुर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढते आणि दात किडतात आणि भविष्यात मधुमेहासारखी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तापामध्ये झाली वाढ...

दिवाळीनंतर लगेचच विषाणूजन्य तापामध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, उलट्या होणे अशा सामान्य तक्रारी आढळून येत. असल्याची माहिती, लुल्लानगर येथील नवजात तथा बालरोगतज्ञ डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली.

दिवाळीनंतरच्या कालावधीत मुलांमध्ये ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते, तर प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहेत. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा सामान्य तक्रारी घेऊन मुले रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी प्रदूषण आणि फटाक्यांच्या धुराचा प्रादुर्भाव कमी करणे, मास्कचा वापर करणे तसेच धूळ, परागकण, प्राण्यांची केस किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. - डॉ. सम्राट शाह, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट

काय काळजी घ्याल?

- मिठाई आणि तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात करावे.- फराळ तसेच मिठाईला पौष्टीक करण्यासाठी त्यात काजू, तेलबिया आणि गूळाचा वापर करा.- सकाळी चालायला जाताना मास्कचा वापर करावा- सकाळच्या वेळी हवेत धुरके दिसून आल्यास ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी फिरायला जाणे टाळावे

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2023Socialसामाजिकdoctorडॉक्टरfoodअन्न