शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, ४ एप्रिलपासून बसणार उपोषणास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:27 IST

सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे

सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी ३ एप्रिलपासून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत भूसंपादनाची गरज, प्रकल्पामुळे होणारे बदल, मोबदल्याचे स्वरूप आणि त्याबाबतचे नियम स्पष्ट केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मौजे पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या गावांतील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, ४ एप्रिलपासून उपोषणास बसणार आहेत.

शासनाने अन्यायकारक पद्धतीने विमानतळ लादलेले आहे. त्याच्या भूसंपादनासाठी शासन शेतकऱ्यांचा गळा दाबू पाहत आहे. शासनाने सर्वेक्षण आणि भूसंपादन याची प्रक्रिया सुरू केल्याने सामान्य आणि गरीब शेतकरी भयभीत झाले आहेत. लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व प्रशासन शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सातही गावांतील शेतकरी हवालदिल झाले असून, गावागावांत झालेल्या बैठकांमधून उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. ४ एप्रिलपासून प्रांत अधिकारी व तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकरी उपोषण सुरू करीत आहोत. जोपर्यंत सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळagitationआंदोलनFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार