शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वारीची पताका फडकली थेट लंडनमध्ये..!

By admin | Updated: July 9, 2015 02:46 IST

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या वारीची पताका थेट लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात फडकली आहे.

सायली जोशी, पुणेमहाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या वारीची पताका थेट लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात फडकली आहे.आॅक्सफर्ड विद्यापीठातील इंटरडिसिप्लिनरी डॉट नेट या संस्थेअंतर्गत ग्लोबल कॉन्फरन्स आॅन पिलग्रीमिनेज (यात्रा) या विषयावर आयोजित परिषदेत ठाण्यातील वरदा संभूस या विद्यार्थिनीने वारी हा विषय केंद्रस्थानी धरून एक शोधप्रबंध नुकताच सादर केला आहे. वरदा ही सध्या जवाहरलाल नेहरूविद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. करीत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि समाजात वारीचे मराठी मनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित करतानाच तिने महाराष्ट्रातील राजकारण, समाजव्यवस्था आणि त्यावर असणारा वारीचा प्रभाव यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून ते सातासमुद्रापार नेऊन मांडले आहे.जगभरात विविध कारणांनी आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रांचा तेथील समाजावर होणारा परिणाम याविषयाचा ऊहापोह व साकल्याने अभ्यास करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक ३ ते ५ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण १८ देशांतील ३५ प्रतिनिधींनी आपले रिसर्च पेपर सादर केले होते. वारीच्या माध्यमातून राज्यभरातले अठरापगड जातींचे लोक एकत्र येतात व त्याचा समाजावर कसा परिणाम होतो व त्याचे ऐतिहासिक संदर्भ काय, हा विषय वरदाने यात मांडला.१३ व्या शतकात जात, स्त्रियांचे समाजातील स्थान, अस्पृश्यता, कर्मकांड यांबाबत समाजात मोठ्या प्रमाणात चळवळ चालू होती. या काळात लोकांवर जात, धर्म, पंथ या गोष्टींचा मोठा पगडा होता. परंतु लोक आपापल्या पद्धतीने जीवन जगत होते. त्यांना खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचे काम आपल्या संतांनी केले असून, त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आहे, अशी भूमिका या रिसर्च पेपरमधून तिने मांडली आहे.वैष्णवांची पताका ब्रिटिशांच्या दारीभारतात ब्रिटिश राजवटीनंतर न्याय, समता-बंधुता, लोकशाही या आधुनिक संकल्पना उदयास आल्या, असा आजही समज आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसून ही आधुनिकता भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आधीपासूनच अस्तित्वात होती. त्याचा परिपाक म्हणजे वारी आहे, हेच मी माझ्या अभ्यासातून मांडले. - वरदा संभूस, राज्यशास्त्र अभ्यासिका