शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

#AnokhaBappa: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अखंडित परंपरा : वसा, वारसा निसर्गपूजनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:28 IST

पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत. 

ठळक मुद्देप्लॅस्टर आॅफ पॅरिस नव्हे; तर लाकडाची गणेशमूर्तीत्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण

पुणे : समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञानदृष्ट्या समाजाला साक्षर करण्याकरिता या उत्सवाची भूमिका महत्त्वाची ठरू लागली. यातच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत. त्वष्टा कासार समाज संस्थेच्या श्रींची मूर्ती ही शमीच्या लाकडापासून बनवली गेलेली एक ऐतिहासिक मूर्ती म्हणून ओळखली जाते. यंदा हे मंडळ १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. संस्थेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयीची माहिती देताना मंडळाचे अंजलेश वडके यांनी सांगितले, की साधारण १९०४ मध्ये शमीच्या वृक्षाच्या लाकडापासून मूर्ती तयार करण्यात आली. गुजरातमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली. वास्तविक गणपतीला प्रिय असणारा शमी वृक्ष हे एक धार्मिक कारण असून शमीच्या सालीचा उपयोग दमा, श्वेतकुष्ठ, कुष्ठरोग या रोगांवर होतो. उत्सवाबरोबरच त्यातून वैज्ञानिक व आरोग्यपूर्ण संदेश जात असल्याने लाकडाची गणेशमूर्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली असून तिचे जतन करण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती मूर्ती फायबरची आहे. नागरिकांनी निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी शोभायात्रा व श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून संदेश दिला जातो.  १८९६ मध्ये श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. मारुती खेडकर यांनी पिंपळाच्या वृक्षापासून श्रींची मूर्ती बनवली. पुढे २००२ मध्ये एका अपघातात या मूर्तीचे नुकसान झाले. तिचे दाभोळच्या खाडीत विसर्जन केले. पुढे कार्यकर्त्यांनी आपल्याला लाकडाचीच मूर्ती हवी, असा आग्रह धरला. यानंतर इचलकरंजी येथून बर्माटिक लाकडापासून व राजस्थान येथील कारागिराकडून तयार करून घेण्यात आली. सामाजिक विषयांबरोबरच पर्यावरणपूरक विषयांना केंद्रस्थानी ठेवून समाजाचे प्रबोधन करण्यावर मुख्य भर असल्याचे श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख दत्ताभाऊ परदेशी यांनी सांगितले. मागील वर्षी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा देखावा मंडळाने सादर केला होता. यावर्षी ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ या विषयावर हलते देखावे सादर करण्यात येणार आहेत. 

* ‘ना गुलाल ना डीजे’ पारंपरिक वाद्ये जाऊन त्याची जागा डीजेने घेतली. मात्र यामुळे वाद्यानंद हरपून त्याची जागा गोंगाटाने घेतली. गेल्या काही वर्षांपासून शहरात डीजेची क्रेझ वाढत असून ढोल, झांज, लेझीम यांचा आनंद घेण्यास कुणी मागत नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना कमीत कमी प्लॅस्टिक, थर्माेकोलचा वापर, शताब्दी वर्षापासून नो गुलाल आणि नो डॉल्बी असा निर्णय त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.   

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवenvironmentवातावरण