शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

#AnokhaBappa: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अखंडित परंपरा : वसा, वारसा निसर्गपूजनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:28 IST

पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत. 

ठळक मुद्देप्लॅस्टर आॅफ पॅरिस नव्हे; तर लाकडाची गणेशमूर्तीत्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण

पुणे : समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञानदृष्ट्या समाजाला साक्षर करण्याकरिता या उत्सवाची भूमिका महत्त्वाची ठरू लागली. यातच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत. त्वष्टा कासार समाज संस्थेच्या श्रींची मूर्ती ही शमीच्या लाकडापासून बनवली गेलेली एक ऐतिहासिक मूर्ती म्हणून ओळखली जाते. यंदा हे मंडळ १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. संस्थेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयीची माहिती देताना मंडळाचे अंजलेश वडके यांनी सांगितले, की साधारण १९०४ मध्ये शमीच्या वृक्षाच्या लाकडापासून मूर्ती तयार करण्यात आली. गुजरातमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली. वास्तविक गणपतीला प्रिय असणारा शमी वृक्ष हे एक धार्मिक कारण असून शमीच्या सालीचा उपयोग दमा, श्वेतकुष्ठ, कुष्ठरोग या रोगांवर होतो. उत्सवाबरोबरच त्यातून वैज्ञानिक व आरोग्यपूर्ण संदेश जात असल्याने लाकडाची गणेशमूर्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली असून तिचे जतन करण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती मूर्ती फायबरची आहे. नागरिकांनी निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी शोभायात्रा व श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून संदेश दिला जातो.  १८९६ मध्ये श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. मारुती खेडकर यांनी पिंपळाच्या वृक्षापासून श्रींची मूर्ती बनवली. पुढे २००२ मध्ये एका अपघातात या मूर्तीचे नुकसान झाले. तिचे दाभोळच्या खाडीत विसर्जन केले. पुढे कार्यकर्त्यांनी आपल्याला लाकडाचीच मूर्ती हवी, असा आग्रह धरला. यानंतर इचलकरंजी येथून बर्माटिक लाकडापासून व राजस्थान येथील कारागिराकडून तयार करून घेण्यात आली. सामाजिक विषयांबरोबरच पर्यावरणपूरक विषयांना केंद्रस्थानी ठेवून समाजाचे प्रबोधन करण्यावर मुख्य भर असल्याचे श्री लाकडी गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख दत्ताभाऊ परदेशी यांनी सांगितले. मागील वर्षी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा देखावा मंडळाने सादर केला होता. यावर्षी ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ या विषयावर हलते देखावे सादर करण्यात येणार आहेत. 

* ‘ना गुलाल ना डीजे’ पारंपरिक वाद्ये जाऊन त्याची जागा डीजेने घेतली. मात्र यामुळे वाद्यानंद हरपून त्याची जागा गोंगाटाने घेतली. गेल्या काही वर्षांपासून शहरात डीजेची क्रेझ वाढत असून ढोल, झांज, लेझीम यांचा आनंद घेण्यास कुणी मागत नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना कमीत कमी प्लॅस्टिक, थर्माेकोलचा वापर, शताब्दी वर्षापासून नो गुलाल आणि नो डॉल्बी असा निर्णय त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.   

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवenvironmentवातावरण