शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे उजनी धरण भरले १०१ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:28 IST

जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार

ठळक मुद्देमुख्य कालव्यातून सोडले ८०० क्युसेक पाणी : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

इंदापूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे.संपूर्ण वर्षभर वरील तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे भरली असून, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी उजनी धरण १०० टक्के भरले. मागील वर्षी ऑगस्ट सुरुवातीला उजनी धरण १०० टक्के भरून विसर्ग चालू होता. यंदा मात्र उजनी शंभर टक्के भरण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे. उजनी धरणाची सद्य परिस्थिती

एकूण पाणीपातळी ४९६.९०० मीटर

एकूण पाणीसाठा ३३४३. ६२ दलघमी( एकूण पाण्याचा टीएमसी  ११८.०७ )

उपयुक्त पाणीसाठा १५४०.८१  दलघमी(उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५४.४१)

एकूण उजनी धरण भरलेली टक्केवारी १०१.५६ टक्के

_______________________________________

उजणीतून सोडलेला विसर्ग

*सिना -  माढा उपसा सिंचन  - २६२ क्युसेक

*भीमा सिना बोगदा  - ९०० क्युसेक

*मुख्य कॅनॉल - ८०० क्युसेक_______________________________________ 

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीRainपाऊसFarmerशेतकरी