शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

उद्देशांशी गद्दारी केल्याने आपल्या देशातील बलिदाने व्यर्थ गेली : तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 12:50 PM

ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

पुणे : ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या व्यर्थ न हो बलिदान या चर्चा सत्रामध्ये गांधी बोलत होते. यावेळी, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, अमोल पालेकर आदी या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते.

तुषार गांधी यांच्या भाषणातील मुद्दे :- - बापूंना मारणाऱ्या शक्ती आपल्याला आज झुकवत आहेत. त्यामुळे बापूंचे बलिदान व्यर्थ जात आहे.

- मारणाऱ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती नसते त्यामुळे ते गोळ्यांचा आधार घेतात. 

- आपल्याला प्रेरणा देणारी व्यक्ती गेल्यावर आपण कमकुवत होतो, त्यामुळे दरवर्षी आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी लागते. त्यामुळे आता व्यर्थ नही जाणे देंगे बलिदान अशी घोषणा आपण द्यायला हवी. 

- पाच वर्षे झाली दाभोलकरांचे मारेकरी शोधले नाही. या मारेकरांची लिंक ज्यांच्यापर्यंत आहे ती मिटवण्यासाठी हा पाच वर्षांचा काळ घेण्यात आला आणि आता आपल्यापर्यंत काही येणार नाही याची खात्री झाल्यावर काहींना अटक करण्यात येत आहे. त्यांना पुढे कदाचित पुराव्याअभावी सोडण्यात येईल. परंतु यांच्या मागे ज्या संस्था आहेत त्यांना समाजाने शिक्षा देण्याची गरज आहे. त्यांना बहिष्कृत करणे हीच त्यांची शिक्षा आहे. 

- सध्या प्रश्न विचारणाऱ्यांना मारण्याचे काम चालू आहे, प्रश्न विचारले की देशद्रोही ठरवले जात आहे. 

- आपल्याला या प्रवृतींविरोधात राग यायला हवा. परंतु आपला विरोध हा लोकशाही मार्गानेच असला पाहिजे. राग येणं चांगलं असलं तरी हा राग आपल्याला नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. 

- संविधान जाळलं गेलं कारण त्या लोकांना संविधानाची भीती वाटते. देशाला वाचवायचं असेल तर हिंसेला हरवावं लागेल. 

- आपले विचार हे प्रखर व्हायला हवेत. नाहीतर आतापर्यंतची सर्व बलिदाने व्यर्थ जातील.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभाग