शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 11:38 IST

पार्थ पवार यांच्या 'सत्यमेव जयते' या ट्विटमागे 'हे 'असे असू शकते कारण..

ठळक मुद्देलोकसभेची उमेदवारी देताना पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का.? शरद पवारांना टोला

पुणे : राजकीय जीवनात प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबियांचेच आहे. तसेच ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यावेळी पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का ? की त्यांना अशीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती असा प्रश्न उपस्थित करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येतील असेेही तेे म्हणाले.

तसेच पार्थ पवार यांना देखील सुशांत प्रकरणात काहीतरी मोठे सत्य दडपले जात असल्याचे वाटलं असेल. त्यामुळेच 'ते ' सत्य आपण बाहेर काढावे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले असेेल, अशा शब्दात बापट यांनी पार्थ यांच्या ट्विट वर देखील रोखठोक भाष्य केले. 

 

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली.तसेच संथ गतीने सुरू असलेले जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामाबाबत त्यांनी पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन सादर करून नाराजी व्यक्त करत, वेळेत काम न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

बापट म्हणाले,राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. आपण राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नये. जेणेकरून त्यातून काही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे त्याला किंमत किती हे सर्वांना अगोदरपासून माहिती आहे. कोणाच्या मागे कोण उभा आहे ,हे थोड्या दिवसांत कळेल, ते ही बाहेर येईल.तसेच सुुशांत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येेणार आहे.

पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत बापट म्हणाले,भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. ती विचारसरणी पार्थ यांना पटते का हे त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात भाजपची मंडळी हुशार आहे, आणि योग्य तो निर्णय ते घेतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.........काय आहे नेमके पार्थ पवार प्रकरण..  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देत केलेली 'सीबीआय चौकशीची मागणी' असो किंवा 'जय श्री राम' म्हणत राम मंदिराच्या उभारणीला दिलेल्या शुभेच्छा दिल्याने ते राजकीय चर्चेत आले होते. मात्र राष्ट्रवादीच्या विसंगत भूमिका घेतल्याने त्यांचे आजोबा व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारले होते. त्यानंतर पवार कुटुंबात नवा वाद उद्भवला होता. मात्र, बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या त्यानंतर स्नेह भोजनानंतर पवार कुटुंबातल्या या वादावर वादावर पडदा पडला होता. पण बुधवारी ( दि. १९) सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा  तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय दिला.त्यानंतर पुन्हा एकदा पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागgirish bapatगिरीष बापटSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवारBJPभाजपाState Governmentराज्य सरकार