शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सरकारविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:14 PM

वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देआजपासून पुणे ते नाशिक पायी लॉंग मार्चआदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार राज्यातील मुले आणि मुली या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार

पुणे : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधांसाठी नेहमीच आंदोलन करावे लागत असून, सरकार वसतिगृहच मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. विद्यार्थ्यांना भोजन न पुरवता डीबीटीप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे भरणार असल्याने आधीच सरकारचे कोणतेच पैसे वेळेत मिळण्याविषयी ओरड असताना आता पुन्हा न्व्याने घाट नक्की कशासाठी घालण्यात आला आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांकडून एल्गार पुकारण्यात येणार आहे.     वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्वाचा निषेध म्हणून पुणे ते नाशिक पायी मोर्चा (लॉंगमार्च) आजपासून सुरू केला आहे. आदिवासी विद्यार्थी आक्रोश मोर्चा असे या आंदोलनाला नाव दिले आहे. १८तारखेला हा मोर्चा नाशिक येथे पोहचणार असून त्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मात्र, सरकारला विद्यार्थ्याबद्दल थोडी तरी सहानुभूती असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा हाच मोर्चा अधिवेशनाकडे वळविण्यात येईल असा इशारा दिला आहे. राज्यातील मुले आणि मुली या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. मांजरीतून निघालेली मुले सध्या कोरेगाव पार्क येथे पोहचली असून नाशिक फाट्यावरून हा मार्च पुढे जाणार आहे. साधारण ३ ते ४  हजार विद्यार्थी यात ठिकठिकाणी सहभागी होणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMorchaमोर्चाStudentविद्यार्थीGovernmentसरकारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना