शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पुरुषोत्तम उंचावण्यासाठी सर्व निकषांवर पात्र व्हावे; परीक्षकांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 10:20 IST

मनात सल राहावी म्हणून दिला नाही करंडक

पुणे : ‘पुरुषोत्तम’ करंडक हातात घेणे, उंचावणे, त्याचा जल्लोष करणे यामध्ये एक वेगळा आनंद आहे. मात्र, पुरुषोत्तम उंचावण्यासाठी एकांकिकेचे जे निकष पार पाडावे लागतात त्या कसोटीवर एकही एकांकिका नव्हती. पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळाला तरी ‘करंडक’ उंचावता आला नाही ही सल कलावंतांच्या मनात राहावी आणि पुढे जाऊन पुरुषोत्तम उंचावण्यासाठी सर्व निकषांवर पात्र व्हावे यासाठी कलावंतांनी भविष्यात आणखी प्रयत्न करावेत, हीच करंडक न देण्यामागची भावना आहे, अशी भूमिका परीक्षक पौर्णिमा मनोहर यांनी मांडली.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये यंदा प्रथम क्रमांक दिला. मात्र, करंडक दिला गेला नाही. त्यावरून नाट्यक्षेत्रामध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यानिमित्त सुदर्शन रंगमंच येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रीय कलोपासक संघाचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे, परीक्षक पौर्णिमा मनोहर, परीक्षक परेश मोकाशी यांच्यासह स्पर्धेत सहभागी संघातील कलावंत, तंत्रज्ञ व नाट्यक्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेतला.महाजन म्हणाल्या की, स्पर्धा म्हटले की त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक दिला गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही स्पर्धेचे पारितोषिक व रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला; मात्र पुरुषोत्तम करंडक उंचावण्यासाठी नाटकांचे जे निकष लागतात त्या निकषात बसणारे एकही नाटक आम्हाला वाटले नाही. कलाकारांनी बक्षिसापुरते न राहता खरे नाटक शिकले पाहिजे याकडे जास्त लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दर्जा टिकून राहावा म्हणून नियम

आयोजकांनी नियमात बदल करावेत. कलावंतांच्या जनभावना पाहून नियमात लवचिकता असावी, अशा सूचना कलावंतांनी मांडल्या. त्याला उत्तर देताना ॲॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले की, पुरुषोत्तम सुरू झाला तेंव्हा इतके नियम नव्हतेच. मात्र, स्पर्धेेचा वाढता प्रतिसाद पाहता स्पर्धेतील दर्जा टिकून राहावा, शिस्त राहावी यासाठी नियम होत गेले. ते नियम जसे कलावंतांसाठी आहे तसेच ते नियम परीक्षक व आयोजकांसाठीसुद्धा आहेत. त्यामुळे साऱ्यांनीच सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.

कलाकारांनी करंडकाचा मान उंचावला

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने किंवा महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने आजपर्यंत एकही कलाकार घडविलेला नाही. जब्बार पटेल, सोनाली कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक कलावंतांमध्ये नाट्य क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याची धमक आणि ऊर्मी होती म्हणून ते मोठे झाले. पुढे जाऊन त्यांनी मत मांडले की, पुरुषोत्तममुळे आम्ही घडलो. त्यामुळे पुरुषोत्तमचा मान वाढला आहे. त्यामुळे यंदा पुरुषोत्तम मिळाला नाही म्हणून खूप मोठे संकट कलाकारांवर आले आहे किंवा कलाकार घडणार नाहीत, असे मानण्याचे कारण नाही, असा समारोप ॲॅड. राजेंद्र ठाकूर देसाई यांनी केला आणि चर्चासत्राचा समारोप झाला. मात्र, तास-दोन तासांच्या चर्चासत्रानंतरही अनेक प्रश्न रेंगाळत राहिले.

टॅग्स :PuneपुणेartकलाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय